‘शस्त्रसंधी’चं उल्लंघन पाकला पडलं महागात, भारतानं ‘उध्दवस्त’ केल्या चौक्या, 3-4 रेंजर्सचा ‘खात्मा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय सैन्य पाकिस्तानकडून होणाऱ्या सीमेवरील गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे. आता भारतीय सैन्याने पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त करण्याबरोबरच अनेक पाकिस्तानी रेंजर्सना ठार केले आहे.

नियंत्रण रेषेवरील युद्धबंदीचे उल्लंघन केल्याने पुन्हा एकदा पाकिस्तान लष्कराला नुकसान सोसावे लागले आहे. प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. यासह भारतीय लष्कराने ३-४ पाकिस्तानी रेंजर्सना ठार केले आहे. गुरुवारी रात्री पाकिस्तानने पुंछ-राजौरी सेक्टरमध्ये युद्धबंदीचे उल्लंघन केले आणि मोर्टार डागले होते.

यापूर्वीही दिले होते प्रत्युत्तर:

यापूर्वी बुधवारी जम्मू-काश्मीरमधील उरी येथे युद्धबंदीचे उल्लंघन करत पाकिस्तानने तोफ डागली आणि गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याच्या या भयावह कृत्यामुळे भारतीय लष्कराचा सुभेदार हुतात्मा झाला. भारताच्या वतीने सैन्याने पाकिस्तानला आर्टिलरी आणि मोर्टार देऊन प्रत्युत्तर दिले.

भारतीय सैन्याने केलेल्या या जवाबी कारवाईत पाकिस्तानी सैन्याच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या. यासह पाकिस्तानी सैन्याने कबूल केले आहे की त्यांचे दोन सैनिक पाकव्याप्त काश्मीरच्या देवा सेक्टरमध्ये मारले गेले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/