‘बिहारच्या निवडणुकीमध्ये फडणवीसांचं यश, जनतेचा नरेंद्र मोदींवर विश्वास’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल काही तासातच स्पष्ट होणार आहे. राज्यातील मतमोजणीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलं आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे लवकरच स्पष्ट होईल, याची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. बिहार विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आणि प्रभारी म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांना संधी दिली होती. फडणवीस यांनी बिहार निवडणुकांसाठी राजनीती आखली आणि प्रचारही केला. दरम्यान, निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात फडवणीस यांना कोरोनाचा संसर्ग झाला. मुंबईतील जॉर्ज रुग्णालयात त्यांनी उपचार घेऊन कोरोनावर मात केली. मुंबईत परतले होते तेव्हा बिहार निवडणूक प्रचाराची सांगता झाली होती. फडणवीस यांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने निभावून निभावली. तसेच, राजकारण आणि नेतृत्वा हेच यश असल्याचे देखील भाजपचे नेते आणि माजी आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीची जबाबदारी उचलली. राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलं. बिहार जनतेने भाजपवर, पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएकडे कल असल्याचे चित्र एक्झिट पोलमध्ये दाखवलं. या निवडणुकीतील एनडीए 130 च्या वर जाईल आणि महागठबंधन 100 च्या खाली येईल असा विश्वास आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विरोधात वातावरण असल्याचे दाखवलं, अशीही प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेली आहे.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी केला विजयाचा दावा

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी सोमवारी मतमोजणीच्या एक दिवस आधी दावा केला, की बिहारमध्ये एनडीए सरकार प्रचंड बहुमताने बनणार आहे आणि नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारतील. बिहारमधील तीन टप्प्याच्या निवडणुका संपल्यानंतर एक गोष्ट निश्चित आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.