20 लाख शेतकर्‍यांना मिळणार 36 हजार रूपये दरवर्षी, आता फक्त 5 कोटी शेतकरी घेऊ शकतात PMKMY चा फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली पेंशन स्कीम मानधन योजनेनुसार आतापर्यंत 19,60,152 शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे. या पेंशन योजनेनुसार पहिल्या टप्यामध्ये पाच कोटी शेतकऱ्यांना यामध्ये जोडायचे आहे ज्यांच्याकडे दोन हेक्टर जमीन आहे. केंद्र सरकारने 9 ऑगस्ट 2019 ला या योजनेसाठी नोंदणी सुरु केली होती. या योजनेनुसार साठ वर्षानंतर शेतकऱ्यांना तीन हजार प्रती महिना आणि वार्षिक 36 हजार रुपये मिळतील.

हरियाणातील शेतकरी सर्वात पुढे
केंद्रीय कृषी मंत्रालयानुसार पीएम शेतकरी मानधन योजनेमध्ये सर्वाधिक शेतकरी हे हरियाणातील आहेत यांची संख्या 4,03,307 इतकी आहे तसेच यानंतर बिहारचा नंबर लागतो बिहारमधील 2,75,384 शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेतला आहे. झारखंड 245707 एनरोलमेंटने तिसऱ्या, उत्तर प्रदेश 2,44,124 शेतकऱ्यांसह चवथ्या आणि छत्तीसगढ 200896 शेतकऱ्यांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

तर वाढणार नाही बोजा
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यावर नोंदणीसाठी कोणताही शुल्क लागणार नाही. जर एखादा शेतकरी शेतकरी सन्मान योजनाचा लाभ घेत आहे तर याकडून या योजनेसाठी कोणतीही कागदपत्रे मागितली जाणार नाही.

या योजनेतून मिळणाऱ्या नफ्यातून शेतकरी थेट हातभार लावू शकतात. अशा प्रकारे, त्याला थेट त्याच्या खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत. यात केवळ 18 ते 40 वर्षांपर्यंतचे शेतकरी नोंदणी करू शकतात.

मधेच योजना सोडायची असेल तर
आधार कार्ड सर्वांसाठी गरजेचे आहे. जर एखाद्या शेतकऱ्याला मधेच योजना सोडायची असेल तर त्याचे पैसे बुडणार नाही. त्याने जमा केलेल्या पैशावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज देखील दिले जाईल. जर शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला यातील 50 % रक्कम दिली जाईल.

किती द्यावे लागतील पैसे
जितका पैसे शेतकरी देतील तेव्हडीच रक्कम सरकार देखील देणार आहे. याचा कमीतकमी हफ्ता 55 आणि सर्वाधिक 200 रुपये आहे. जर मधेच कोणाला पॉलिसी सोडायची असेल तर जमा केलेली रक्कम आणि त्यावरील व्याज शेतकऱ्याला दिले जाईल. जर शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला 1500 रुपये प्रति महिना मिळेल.