नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील रीवामध्ये स्थापन करण्यात आलेल्या 750 मेगाव्हॅटचा सौरऊर्जा प्रकल्प आज देशाला समर्पित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा प्रकल्प देशाला समर्पित केला. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा प्रकल्प आशियातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प आहे.
सौरऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. ते म्हणाले, आज रीवाने इतिहास रचला आहे. जेव्हा आम्ही आकाशातून टिपलेल्या या प्लांटचा व्हिडीओ पाहतो, त्यावेळी असं वाटतं की, हजारो सोलार पॅनल शेतातल्या पिकांप्रमाणे डोलत आहेत. रीवाचा सौरऊर्जा प्रकल्प या संपूर्ण क्षेत्राला ऊर्जेचं केंद्र बनणार आहे. यामुळे मध्य प्रदेशातील लोकांना याच लाभ मिळणार असून दिल्ली मेट्रोलाही याची वीज मिळणार आहे. आता रीवामधील नागरिक गर्वाने सांगतील की, दिल्लीतील मेट्रो आमचा रीवा चालवत आहे. याचा फायदा मध्य प्रदेशातील गरीब, मध्य वर्गीय, शेतकरी आणि आदिवासी लोकांना होणार आहे.
आज रीवा ने वाकई इतिहास रच दिया है। रीवा की पहचान मां नर्मदा के नाम और सफेद बाघ से रही है। अब इसमें एशिया के सबसे बड़े सोलर पावर प्रोजेक्ट का नाम भी जुड़ गया है। इस सोलर प्लांट से मध्य प्रदेश के लोगों को,उद्योगों को तो बिजली मिलेगी ही,दिल्ली में मेट्रो रेल तक को इसका लाभ मिलेगा:PM https://t.co/DHxkCCbG1K pic.twitter.com/UD7Nmjgi9H
— ANI_HindiNews (@AHindinews) July 10, 2020
दिल्ली मेट्रोला होणार फायदा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, रीवाची ओळख आई नर्मदेमुळे आणि पांढऱ्या वाघांमुळे आहे. आता रीवाचं नाव आशिया खंडातील सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाशी जोडलं जाणार आहे. रीवाचा हा सोलार प्लांट या संपूर्ण क्षेत्राला या दशकातील सर्वात मोठं ऊर्जेचं केंद्र बनवण्यासाठी मदत करणार आहे. या प्रकल्पामुळे मध्य प्रदेशातील उद्योगांसोबतच दिल्लीतील मेट्रोलाही फायदा होणार आहे.
पंतप्रधानांनी सांगितलं की, मध्य प्रदेशातील रीवामध्ये आशियातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. हा प्रकल्प रीवा जिल्ह्यातील मुख्यालपासून 25 किमी दूर गुढमध्ये 1590 एकरमध्ये पसरला आहे. हा प्रकल्प रीवा अल्ट्रा मेगा सोलार लिमिटेड, एमपी ऊर्जा विकास लिमिटेड आणि भारताचे सौरऊर्जा निगम यांचा एक संयुक्त उपक्रम आहे.