‘अलविदा…मोदी’ म्हणण्याची वेळ : प्रकाश आंबेडकर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – प्रत्येक गोष्टीला जसा अंत असतो, तसाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील राजकीय अंत होणार आहे. त्यांना लवकरच ‘अलविदा……मोदी’ असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवाराच्या प्रचारार्थ कोपरगाव येथे आयोजित प्रचार सभेत आंबेडकर बोलत होते. आंबेडकर म्हणाले की, मागील तीन वेळा काँग्रेस-राष्ट्रवादी या आघाडीचे उमेदवार शिर्डीत मतदारसंघात निवडून आले नाहीत. रामदास आठवले यांचा पराभव देखील प्रस्थापितांनीच केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदी व नोटा बदलीचा निर्णय देशातील काळ्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणारा ठरला. इथल्या सुशिक्षित, अनुभवी व जाणकार लोकांनी स्वत:वर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. ही लोकसभा निवडणूक म्हणजे गेल्यावेळी केलेली चूक दुरुस्त करण्याची नामी संधी आहे, असेही आंबेडकर म्हणाले.