‘राष्ट्रवादी’वाले असेच भाजपात येत राहिले तर भाजप ‘चोर पक्ष’ होईल : प्रकाश आंबेडकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादीवाले असेच भाजपात येत राहिले तर भाजपा चोरांचा पक्ष होईल असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीला लागावला. काँग्रेस आघाडीबाबत बोलताना ते म्हणाले, काँग्रेसला ऑफर दिली आहे. आणखी काही दिवस वाट पाहून निर्णय घेणार असून आम्ही जास्त दिवस थांबू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी हा भांडवलशाही आणि संधीसाधू पक्ष असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता भाजपा हा विजय मिळवून देईल असे जास्त वाटू लागले आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते असेच भाजपात गेले तर भाजपा चोरांचा पक्ष होईल. आरक्षणावर बोलताना आंबेडकर म्हणाले, आरक्षणावर चर्चा करू असे मोहन भागवत म्हणतात तेव्हा आरएसएसला आरक्षण नको असा अर्थ होतो. भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास आरक्षण रद्द करेल यासाठी भाजपला हलवलं पाहिजे असेही त्यांनी यावेळी म्हटले.

ईडीची चौकशी असेल किंवा राज्य बँक प्रकरणी गुन्हे हा केवळ फार्स असून कुणालाही अटक होणार नाही असे सांगत आता आण्णा हजारे झोपले आहेत अशी टीका त्यांनी केली. दरम्यान आज काँग्रेसच्या छाननी बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी वंचितशी सोबतची बोलणी फिसकटल्याचे सांगत त्यांच्या सोबत आघाडी होण्याची चिन्ह दिसत नसल्याचे सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –