मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा आणि शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा घोळ काही केल्या संपत नाही. कोण मुख्यमंत्री होणार आणि कोणाला किती मंत्रीपदे द्यायची याचा घोळ काही केल्या संपत नाही. या दोन पक्षातील भांडणात महायुतीतील इतर घटक पक्ष पूर्णपणे दुर्लक्षित झाले आहेत. यांचेच ठरत नसल्याने आम्हाला काहीतरी द्या, याची मागणी कोणाकडे करायची आणि या परिस्थितीत ते त्याकडे लक्ष देणार का अशी या घटक पक्षांची गोची झाली आहे.
भाजपाच्या घटक पक्षातील रिपाईचे रामदास आठवले, शिवसंग्रामचे विनायक मेटे, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, राज्यमंत्री सदा खोत यांची गुरुवारी मुंबईत बैठक झाली. मंत्रीमंडळात आपल्याला मंत्री पद मिळावी, यासाठी त्यांनी चर्चा केली. पण ही चर्चा त्यांनी आपापसात केली. भाजपा आणि शिवसेनेच्या कोणताही नेता सध्या त्यांचे ऐकून घेण्याच्या मनस्थिती नाहीत. त्यामुळे या सर्वांना युतीचे सरकार येईल का व त्यात आपल्याला मंत्रीपद पुन्हा मिळणार का याविषयी घोर लागला आहे.
रामदास आठवले यांनी रिपाईला कॅबिनेट मंत्रीपद मिळावे, आणखी काही महामंडळे मिळावीत, अशी मागणी आहे. इतरांनाही सर्वप्रथम आम्हाला मंत्री करा हीच त्यांची मागणी आहे. मुख्यमंत्री त्याकडे सध्या किती लक्ष देतील, याचिषयी त्यांना चिंता आहे. जर शिवसेनेची राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या आघाडी झाली तर आपले काय असा प्रश्न या घटक पक्षातील नेत्यांना पडला आहे.
Visit : Policenama.com
- ‘हे’ १० पदार्थ आहेत अतिशय उपयुक्त, शरीरातील निकोटीन होईल ‘फ्लश आऊट’! –
- उपवास करणे फायद्याचे, पण या लोकांनी करू नये, अन्यथा होईल नुकसान ! –
- ‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
- तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
- मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
- संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –