राहुल गांधींकडून टाईम मासिकाचा हवाला देत मोदी सरकारवर गंभीर आरोप
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून केंद्रातील मोदी सरकारवर आरोप करत असतात. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकच्या भाजपच्या भूमिकेवरून वादंग निर्माण झाले होते. आता त्यानंतर व्हॅट्सअॅपवरून राहूल गांधी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. हा आरोप करताना त्यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध टाईम मासिकाचा हवाला दिला आहे.
फेसबुकच्या वादानंतर राहुल गांधी यांनी टाईम मासिकातील वृत्ताचा हवाला देत गंभीर आरोप केला आहे. 40 कोटी भारतीयांकडून वापरलं जाणाऱ्या व्हॉट्सअॅपवर भाजपची पकड असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे. राहुल गांधी यांनी टाईमधील लेख ट्विट करत हा गंभीर आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅप मालकी असलेल्या फेसबुवरही असाच आरोप झाला होता. द वॉल स्टीट जर्नलनं फेसबुकच्या भाजपावर कारवाई न करण्याबद्दलच्या भूमिकेचा गौप्यस्फोट केला होता.
ट्विटमध्ये राहुल गांदी म्हणाले, अमेरिकेच्या टाइम मासिकानं व्हॉट्सअॅप आणि भाजपातील संबंधाचा पर्दाफाश केला आहे. 40 कोटी भारतीय वापरता असलेल्या व्हॉट्सअॅपचा ऑनलाइन व्यवहारांसाठी वापर करण्याची व्हॉट्सअॅपची इच्छा आहे. त्यासाठी त्यांना मोदी सरकारची परवानगी आवश्यक आहे. अशा प्रकारे व्हॉट्सअॅपवर भाजपची पकड आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
America's Time magazine exposes WhatsApp-BJP nexus:
Used by 40 Cr Indians, WhatsApp also wants to be used for making payments for which Modi Govt's approval is needed.
Thus, BJP has a hold over WhatsApp.https://t.co/ahkBD2o1WI
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 29, 2020