संतापजनक ! विष प्रयोगानं तब्बल 23 मोरांचा मृत्यू, शेतकर्याच्या हातानं झाल्यानं सर्वत्र खळबळ
जयपूर : वृत्तसंस्था – उभ्या पिकांच नुकसान केल्याने शेतकऱ्यानं 23 मोरांना विष देऊ ठार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजस्थानमधील बिकानेरमध्ये असलेल्या सेरूना गावात ही घटना घडली असून याप्रकरणी एका शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. या शेतकऱ्याने पिकांचे नुकसान टाळण्यासाठी या मोरांवर विष प्रयोग केल्याचे उघडकीस आले आहे.
Rajasthan: 23 peacocks dead allegedly after a farmer poisoned them to prevent crop damage, in Seruna village in Bikaner. Assistant Conservator of Forests, Forest Department says,"Carcass of 23 peacocks recovered. Farmer Dinesh Kumar has been arrested." pic.twitter.com/ZIjhrIvfNK
— ANI (@ANI) December 24, 2019
वन विभागाचे सहायक वनसंरक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेरून गावात दिनेश कुमार या शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी मोरांवर विष प्रयोग केला. याप्रकरणी दिनेश कुमार याला अटक करण्यात आली आहे. तसेच 23 मोरांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर याची माहिती वन अधिकाऱ्यांना देण्यात आली. वन अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृत मोर ताब्यात घेतले.
यापूर्वी मे 2018 मध्ये राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यात 23 मोरांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत मोरांमध्ये 10 नर मोर तर 13 मादी मोरांचा समावेश होता.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- जाणून घ्या ; ‘व्हिटॅमिन सी’चे आरोग्याला होणारे ‘हे’ ७ फायदे !
- ‘या’ ५ स्टेपमध्ये करा हा व्यायाम, कमी होईल लठ्ठपणा आणि पोटाचा घेर
- तुळस आरोग्यासाठी गुणकारी; ‘हे’ आहेत ६ फायदे !
- ‘मायग्रेन’चा त्रास होतोय ? ‘या’ ६ प्रकारे घ्या काळजी
- शिंकताना डोळे बंद का होतात ? शिंक का येते ? ‘ही’ आहेत २ कारणे
- …म्हणून खावी भेंडीची भाजी, ‘हे’ आहेत ८ आरोग्यदायी फायदे
- दातांच्या आरोग्याबाबत ‘या’ ५ गैरसमजांवर ठेवू नका विश्वास