नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शहरी पक्ष म्हणवणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वात जास्त जागांवर विजयी होऊन देखील सत्तास्थापनेच्या रेसमध्ये पिछाडीवर असलेल्या भाजपच्या गोटात आता नाराजीचा सुर उमटू लागला आहे. कारण महाराष्ट्रापाठोपाठ भाजपला राजस्थानात देखील अपयश येताना दिसत आहे. राजस्थानमध्ये पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत शहरी मतदारांनी भाजपला नाकारल्याचे स्पष्ट दिसत आहे.
Rajasthan local body elections: Congress wins 961 seats, BJP 737 seats. 386 Independent candidates have also won the local body elections. pic.twitter.com/IKFuelyxNg
— ANI (@ANI) November 19, 2019
एकूण 49 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक भाजपला फक्त 6 ठिकाणी विजय मिळाला. तर काँग्रेसला देशातून हद्दपार करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला काँग्रेस भारी पडल्याचे चित्र आहे. या निवडणूकीत काँग्रेसने 23 ठिकाणी आपला विजयाचा झेंडा फडकवला आहे. तर इतर जागांवर अन्य पक्षांनी आणि अपक्षांनी विजय मिळवला आहे. भाजपची ही कामगिरी पक्षश्रेष्ठींना नाराज करणारी आहे. या अपयशामुळे भाजपच्या गोटात चिंता वाढली आहे. 2 महानगरपालिका, 30 नगरपालिका, 17 नगरपरिषदा अशा एकूण 49 ठिकाणी निवडणूका पार पडल्या. त्या भाजप सपशेल फेल ठरला.
आज आए निकाय चुनाव के नतीजे सुखद हैं। जिला परिषद उपचुनाव, पंचायती राज उपचुनाव एवं विधानसभा (मण्डावा, खींवसर) उपचुनाव के बाद निकाय चुनाव में भी प्रदेश की जनता ने हमारी सरकार की जनकल्याणकारी योजनाओं और विकास कार्यों को अपना समर्थन देकर…
1/2— Ashok Gehlot (@ashokgehlot51) November 19, 2019
विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने नारा दिला होता की, मोदी तुझसे बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं. याचा फटका राज्यस्थानच्या तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधराराजेंना बसला. डिसेंबर 2018 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत भाजपला मोठा झटका बसला आणि काँग्रेसने सत्तास्थापन केली. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक काँग्रेसला मोठा फटका बसला होता. तेव्हा भाजपचे कमळ 25 जागांवर फुलले होते.
संवेदनशील, जवाबदेह एवं पारदर्शी शासन और गुड गवर्नेंस देने की हमारी प्रतिबद्धता को और मजबूत किया है।
मैं सभी मतदाताओं का आभार प्रकट करता हूँ और कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता, पदाधिकारी एवम विजयी उम्मीदवारों को बधाई देता हूँ।#Rajasthan 2/2— Ashok Gehlot (@ashokgehlot51) November 19, 2019
राजस्थानात लोकसभेवेळी मोदी लाट चांगलीच उसळी होती. परंतू स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणूकीतील विषय आणि समस्या या देशास्तरावरील समस्यापेक्षा वेगळ्या असल्याचे पुन्हा एकदा देशातील जनतेने राजस्थानच्या रुपात भाजपला दाखवून दिले. भरतपूर आणि बिकानेर या महापालिकेत भाजप मोठा पक्ष ठरला असला तरी नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणूकीत सपशेल फेल ठरला. निवडणूकीपूर्वी 49 पैकी 21 ठिकाणी भाजप सत्तेत होते. हाच भाजप आता 6 वर आले आहे. याउलट काँग्रेसच्या गोटात आनंद आहे. काँग्रेस या निवडणूकीत 23 वर पोहचली आहे. तर 20 ठिकाणी अपक्ष उमेदवारांच्या हातात सत्ता आहे.
या 49 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 6 नोव्हेंबरला मतदान पार पडले. दरम्यान अयोध्येचा निकाल लागणार होता. हा निकाल भाजपला फायदेशीर ठरेल असे दिसत होते, परंतू स्थानिक मुद्यावर निवडणूकीत मतदारांनी मतदान केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणूकात भाजपला अच्छे दिन येणार की इतर पक्षांचे झेंडे फडकणार हे पाहणे औस्तुक्त्याचे ठरेल.
Visit : Policenama.com
- ‘या’ व्यायाम प्रकाराने लाभते दिर्घायुष्य, जाणून घ्या 5 आरोग्यदायी फायदे
- सतत ‘एनर्जी ड्रिंक’ घेतल्याने कमी होते मेंदूची कार्यक्षमता, ‘या’ 3 गोष्टी लक्षात ठेवा
- हिवाळ्यात ‘हे’ 6 आजार ठरू शकतात त्रासदायक, ‘हे’ उपाय आवश्य करा
- योगासने सुरु करण्यापूर्वी आणि नंतर ‘ही’ काळजी घ्या, लक्षात ठेवा ‘या’ 6 गोष्टी
- ‘हे’ आहेत थंड पाण्याचे 5 दुष्परिणाम आणि गरम पाण्याचे तब्बल 14 फायदे
- गुलाबी थंडीत असे सांभाळा तुमचे आरोग्य, ‘हे’ 7 पदार्थ आवश्य सेवन करा
- वजन घटवण्यासाठी ‘या’ 7 टिप्स, केवळ दररोज चालण्याने जळतील 500 कॅलरीज !