‘रात्रीस खेळ चाले’ मालिका बंद झाल्यामुळे शेवंता झाली ‘भावूक’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : प्रेक्षकांची आवडती मालिका असलेल्या ‘रात्रीस खेळ चाले – 2’ या मालिकेने निरोप घेतला आहे. काल अखेरचा भाग प्रसारित झाला. या मालिकेमुळे सर्वाधिक चर्चेत राहिलेली अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर म्हणजे शेवंता हिने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहिली आहे. मालिका संपल्यानंतर शेवंता भावनिक झाली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.

नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम मी आशा करते की आपली आणि जिवलगांची काळजी घेत आहात.. वेळ कठीण जरी असेल तरी आपण पुन्हा जोमाने उभे राहुया.. जसे की आपल्याला ठाऊक असेलच की आपली लाडकी मालिका म्हणजे रात्रीस खेळ चाले 2 ही आज आपला निरोप घेत आहे.. हे लक्षात येताच खूप आठवणी आज पुन्हा दाटून आल्या.

ह्या मालिके चा एक अविभाज्य भाग म्हणून.. मी झी मराठी चे मना पासून आभार मानते.. त्याच बरोबर मी मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते ह्यांचे सुद्धा खूप आभार मानू इच्छिते.. आणि आपण माय बाप प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभल्या बद्दल आपले मनापासून आभार.. मालिका समाप्ती ला आली हे समजायला कठीण तर जात आहेतच पण त्याच बरोबरच खूप सार्‍या आठवणींना पूर्णविराम मिळणार असल्याचे तिने म्हटले आहे .