बिहारच्या मंत्र्याचा खळबळजनक आरोप, म्हणाले – ‘रिया म्हणजे विषकन्या, सुशांतच्या मृत्यूला गँग जबाबदार’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बिहारचे मंत्री आणि जेडीयुचे नेते महेश्वर हजारी यांनी सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

महेश्वर हजारी म्हणाले की, सुशांतसाठी रिया चक्रवर्ती विषकन्या ठरली आहे. सुशांतच्या मृत्यूला एक मोठी गँग कारणीभूत आहे. त्यांची नावे समोर आली पाहिजेत. याच गँगनं रियाला हाताशी धरून सुशांतला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आहे. त्याचे पैसे लंपास केले. नंतर भूत प्रेत, काळी जादू असं नाटक केलं आणि सुशांतला अभिनयापासून दूर केलं असा आरोपही त्यांनी केला आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले की, “सुशांतच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या लोकांची नावं समोर आलीच पाहिजेत. मुंबई पोलीस हे बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतचे वडिल के के सिंह यांनी अभिनेत्याच्या आत्महत्येच्या जवळपास दीड महिन्यानंतर सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह 4 जणांविरोधात एफआयआर देत गंभीर आरोप केले आहेत. मंगळवार दि 28 जुलै पटण्याच्या राजीव नगर पोलीस ठाण्यात ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांची टीम मुंबईत आली आहे. गेल्या 2 दिवसांपासून या प्रकरणी मोठी घडामोड घडताना दिसत आहे. या सगळ्यावर रियानं पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. रियानं तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

रिया म्हणाली, “माझा देवावर आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. मला न्याय नक्कीच मिळेल. इलेक्ट्रॉनिक मीडियात माझ्याबद्दल अनेक विचित्र गोष्टी बोलल्या जात आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं मी त्यावर बोलणार नाही. सत्याचा विजय होईल. सत्यमेव जयते.” रियाचा व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.