भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या सावित्रीबाई फुलेंनी सोडली ‘पंजा’ची साथ, केली ‘ही’ मोठी घोषणा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सावित्रीबाई फुले यांनी वर्षभरापूर्वी भारतीय जनता पार्टी सोडली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु आता त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला आहे. तसेच आता त्यांनी त्यांचा स्वतंत्र पक्ष काढण्याची घोषणा केली आहे.

सावित्रीबाई फुले या बहराईच मतदार संघाच्या माजी खासदार होत्या. भारतीय जनता पार्टीतील त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी ६ डिसेंबर रोजी भाजपमधून राजीनामा दिला होता. तसेच काँग्रेसमध्ये आपले कोणी ऐकत नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुढे त्यांनी आपला स्वतःचा पक्ष काढणार असल्याचेही सांगितले.

2012 मध्ये सवित्रीबाई भाजपकडून बहराईचमधून विधानसभेवर निवडून आल्यानंतर 2014 मध्ये त्यांना लोकसभेचेही तिकीट दिले गेले होते. लोकसभेतही त्यांना विजय मिळाला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/