…तर इतर रेजिमेंटचे जवान सीमेवर तंबाखू मळत होते का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गलवान खोऱ्यामध्ये भारत-चीन सैन्यामधे झालेल्या हिंसक झटापटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाष्यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चकमकीनंतर, बिहार रेजिमेंटची प्रशंसा केली होती. यावर संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया देत, त्या जवानांनी शौर्य दाखवले, तर इतर रेजिमेंटचे जवान काय सीमेवर तंबाखू मळत होते का ? असा सवाल केला आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्यावर हल्लाबोल करताना संजय राऊत म्हणाले, बिहार रेजिमेंटने लडाखच्या गलवान खोऱ्यात डोगरा रेजिमेंट सीमेवर तंबाखू मिळत बसल्या होत्या का ? महाराष्ट्राचा वीर पुत्र सुनील काळे यांना काल पुलवामामध्ये वीरमरण आले. मात्र बिहारमधील निवडणुका आल्याने लष्करात जात आणि प्रांत यांचे महत्त्व सांगितले जात आहे. अशा प्रकारचे राजकारण कोरोनापेक्षाही घात असल्याचे संजय राऊत म्हणाले.

प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. पंतप्रधान मोदींनी रेजिमेंटचे कौतुक केल्यावरून त्यांच्यावर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, लष्कराची कोणतीही रेजिमेंट केवळ रेजिमेंटच असते. प्रत्येक रेजिमेंटची आपली एक परंपरा आणि गाथा आहे. सर्व रेजिमेंट देशाच्या असतात. त्या कुण्या एका प्रात, राज्य किंवा धर्माच्या नसतात, असे राऊत यांनी म्हटले आहे. केवळ बिहारमध्ये निवडणुका आहेत म्हणून बिहारचे नाव घेतले जात आहे.

गलवान खोऱ्यात संपूर्ण देशाचे जवान आहेत. ज्यांना हौतात्म्य येते, ते देशाचे जवान आहेत. ते राष्ट्राचा आत्मा असल्याचे राऊत यांनी म्हटले. तसेच रजपूताना रेजिमेंट, शिख रेजिमेंट, महार रेजिमेंट, बिहार रेजिमेंट, गोरखा आणि डोगरा रेजिमेंट आहेत. परंपरेनुसार या रेजिमेंट्सचे नाव असते. केवळ एकाच रेजिमेंटचे नाव घेणे, एका राज्याचे नाव घेणे, हे राष्ट्रीय अखंडता आणि एकात्मतेसाठी योग्य नसल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.