“सुधर जाओ, वरना सुधार देंगे”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर भारताने दिलं आहे. पाकिस्तानविरोधात भारताने मंगळवारी मोठा कारवाई केली. वायुसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० हजार किलोचा बॉम्बचा हल्ला करत उद्ध्वस्त केला आहे. त्यानंतर भारतातील अनेक सेलेब्रेटी, खेळाडू, राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात भारतीय संघाचा माजी सलामवीर विरेंद्र सेहवागने ही ट्वीट करत भारतीय वायुदलाचे अभिनंदन केले आहे.

‘The boys have played really well’, या वाक्यावरून बऱ्याचदा पाकिस्तानचे क्रिकेटपटू ट्रोल झाले होते. विरूने हेच वाक्य वापरत भारतीय वायुदलाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. कौतुक करताना “सुधर जाओ वरना सुधार देंगे” असा हॅशटॅगशी सेहवागने ट्विट केला आहे.

दरम्यान, भारताने केलेला हल्ला म्हणजे LOC चे उल्लंघन केल्याचा आरोप पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केला आहे. या हल्ल्यात नेमकी किती दहशतवादी मारले गेले याची पक्की माहिती मिळालेली नाही. मात्र अंदाजानुसार या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.