भरधाव ट्रकची तीन दुचाकींना धडक, चार जणांचा मृत्यू

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तीन दुचाकींना धडक बसली. या भीषण अपघातात चारजणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात लातूर-बार्शी राज्यमार्गावर आज (सोमवार) झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातामध्ये नागनाथ मलबा येलगटे (वय -५० रा. चाटा बोपला), शंकर बाळू काळे (वय – २८), बुद्धघोष नामदेव पालखे (वय-३८ दोघे रा. येडशी), प्रजीत पांडुरंग माळी (वय -२८ रा.एकुरगा) यांचा मृत्यू झाला. तर जालिंदर गोपाळ घुट्टे (वय- ६०) आणि मीटाप्पा गोपाळ घुट्टे (वय-५५) हे दोन भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.

लातूर- बार्शी राज्य मार्गा हा सध्या अपघाती रस्ता झाला आहे. आज झालेल्या या विचित्र अपघातांमध्ये चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. लातूरकडून भरधाव वेगात बार्शीकडे जाणारा ट्रक (एमएच १६ क्यू ६८७७) चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे थेट तीन दुचाकीला धडक बसली. अपघातानंतर ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन थांबला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमींना उपराचासाठी रुग्णालयात दाखल करुन पोलिसांना अपघाताची माहिती दिली.