कार्तिकी वारी ! पंढरपुरातून येणाऱ्या मानाच्या 3 दिंड्यांना आळंदीत प्रवेश मिळणार, मात्र …

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी कार्तिकी वारी कार्तिकी वैद्य अष्टमी ८ डिसेंबर पासून भरणार आहे. आषाढी एकादशी ११ डिसेंबरला तर संजीवन समाधी सोहळा दिन कार्तिक वद्य त्रयोदशी तारीख १८ डिसेंबरला आहे. डिसेंबर १४ डिसेंबर पासून वारकऱ्यांचा मुक्काम आळंदीत राहणार आहे. प्रत्येकवर्षी पंढरपुरातून आळंदीतील कार्तिकी वारीसाठी श्री पांडुरंग, संत नामदेव, संत पुंडलिक या तीन दिंड्यां पायी जातात. कार्तिकी वैद्य अष्टमीला आळंदी तीनही दिंड्या पोहोचतात. यंदा करणामुळे आळंदीतील वारीबाबत अध्या[प शासनाने कोणताही निर्णय जाहीर केला नाही मात्र आळंदीतील कार्तिक या तीनही दिंड्यांचे महत्त्व आहे. त्यामुळे राज्य शासनाने पायी वारीऐवजी तीनही दिंड्यांसोबत प्रत्येकी वीस लोकांना आळंदीत येण्यासाठी परवानगी दिली असून स्वतंत्र एसटीची सोय केली आहेत. तीनही दिंड्या ८ डिसेंबरला पंढरपुरातून आळंदी येथील आणि प्रतिपदे पर्यंत आठवडाभर आळंदीत राहण्यासाठी परवानगी आहे. सुरक्षित अंतर ठेवून वारी होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पंढरपुरातील कार्तिकी वारी रद्द झाली यामुळे तीन आठवड्यावर येऊन ठेपलेल्या ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर या आळंदीत होणाऱ्या कार्तिकी वारी आणखीन किती दिंड्या तसेच वारकऱ्यांना राज्यशासन प्रवेश देणार याबाबत उत्सुकता आहे. मात्र, राज्य शासनाने पंढरपुरात परवानगी नाकारल्यानंतर आळंदीत मोजकेच वारकऱ्यांच्या उपस्थितत वारी होण्याचे संकेत आहे. आषाढी एकादशीला माऊलींची पालखी मंदिरातून नगर प्रदिक्षणा निघते. तर द्वादशीच्या दिवशी माऊलींचा रथ नगर प्रदिक्षणेसाठी निघतो याला परवानगी देण्याची मागणी वारकऱ्यांतून होत आहे. याबाबत अद्याप अध्यादेश राज्य शासनाने काढला नाही तरी वारकऱ्यांनी यंदाची कार्तिकी वारी ही खंडित होणार होणार अशी मनाची तयारी केली आहे.

आळंदीतील वारीसाठी राज्यभरातून पंधरा-पंधरा दिवस दिंड्या निघतात, यासाठी सरकारने दिंड्या आपल्या गावातून पाणी निघाल्यानंतर मध्यावर येऊन ठेवल्यावर निर्णय देण्यापेक्षा लवकर जाहीर करावा. अगोदर निर्णय जाहीर केला तर वारकऱ्यांनी मधूनच जावे लागणार नाही कोरोना बाबत आषाढीला वारकर्‍यांनी दक्षता घेतली ती वेळही ती यावेळी घेतील असं आम्ही वारकरी चे रामभाऊ चोपदार यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीतील कार्तिकी वारीकरिता पंढरपुरातून येणाऱ्या मानाच्या ३ दिंड्यांना आळंदीत प्रवेशासाठी राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली. तीनही दिंड्यांसोबत प्रत्येकी वीस वारकऱ्यांना परवानगी असून आळंदीत आठ डिसेंबरला पोहोचणार आहेत.