धाडसी ! 3 महिलांनी अंगावरच्या साड्या फेकून वाचवला बुडणार्‍या 2 युवकांचा जीव, मात्र…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – तामिळनाडूच्या कोट्टाराई डॅममध्ये चार तरुण बुडत असल्याचे पाहून तीन महिलांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रसंगावधान दाखवत  साड्या काढून पाण्यात फेकल्या. विशेष म्हणजे त्यांना दोन तरुणांना वाचवण्यात यशही आले. दुर्दैवाने अन्य दोघांना त्या वाचवू शकल्या नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला. पविथ्रन (वय 17) आणि रंजिथ (वय 25) या दोघांचा मृत्यू झाला.

सिरुवच्चूर गावातील 12 तरुणांचा एक ग्रुप 6 ऑगस्टला क्रिकेट खेळण्यासाठी कोट्टाराई गावात गेला होता. खेळून झाल्यानंतर ते आंघोळ करण्यासाठी कोट्टाराई डॅममध्ये घेले. पण मुसळधार पावसामुळे डॅममधील पाण्याची पातळी वाढली होती. सेंथमिज सेल्वी (38), मुथमल (34) आणि अनंतवल्ली (34) या तीन महिला त्यावेळी जवळच कपडे धुवत होत्या. तरुण आले तेव्हा महिला निघायच्या तयारीत होतो. त्यांनी आम्हाला डॅममध्ये पोहण्याबाबत विचारणा केली. आम्ही त्यांना पाणी खोल असू शकते असे सांगितले होत. नंतर ते पाण्यात बुडायला लागले. त्यांना बुडताना पाहून कसलाही विचार न करता आम्ही आमच्या साड्या काढून पाण्यात फेकल्या. त्यामुळे दोन जणांना वाचवण्यात आम्हाला यश आले. पण दुर्दैवाने अन्य दोघे बुडाले. त्या दोघांचा शोध घेण्यासाठी आम्ही पाण्यातही गेलो पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पाण्यात शोधूनही ही दोन मुले सापडली नसल्याचे सेंथमिज सेल्वी यांनी सांगितले.