काय सांगता ! होय, आसाममध्ये पोलिस पथकावर जमावाचा हल्ला, झाडाला बांधून ‘बेदम’ मारहाण आणि कापले ‘केस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आसाममध्ये दोन पोलीस जवानांना जमावाकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली. ही घटना आसामच्या नगाव जिल्ह्यात राहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. जेव्हा पोलीस एका प्रकरणाचा तपास करण्यासाठी घटनास्थळी गेले होते तेव्हा जमावाकडून पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला.

शारीरिक छळ प्रकरणी पोलीस तपास करत होते –
माहितीनुसार पोलिसांचा एक गट या भागात राहणाऱ्या एक तरुण हिरक ज्योती नाथ आणि त्यांच्या नातेवाईकांच्या विरोधात असलेल्या केसच्या संदर्भात चौकशीसाठी आले होते. हिरक याच्या विरोधात हिरक यांच्या पत्नीकडून केस दाखल आहे. मागील काही महिन्यापासून शारीरिक छळ करण्याचे प्रकरण हिरक यांच्या पत्नीकडून दाखल आहे. हिरक याची पत्नी 5 महिन्याच्या मुलाची आई आहे. महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसात हिरक आणि त्यांच्या कुटूंबातील सदस्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांवर गावकऱ्यांचा हल्ला –
जेव्हा आतिरिक्त पोलीस प्रुफल्ल बोरा यांच्या नेतृत्वात तीन सदस्यांचा पोलिसांचा गट या भागात पोहचला तेव्हा त्यांच्यावर जमावाकडून हल्ला करण्यात आला. माहितीनुसार पोलिसांवर हल्ला करणाऱ्या लोकांमध्ये आरोपी हिरक आणि त्याची आई तसेच कुटूंबातील सदस्य सहभागी होती. पोलिसांना मारहाण करण्यात तेथील स्थानिक लोकांनी साथ दिली.

जखमी पोलीस अधिकाऱ्यांवर रुग्णालयात उपचार –
जमावाने पोलीस अधिकाऱ्यांना पकडून झाडाला बांधले आणि त्यांना मारहाण केली. पोलीस अधिकाऱ्यांचे केस देखील कापण्यात आले. घटनेनंतर तात्काळ एका शिपायाने पोलीस स्टेशनच्या इंचार्जला माहिती दिली त्यानंतर दाखल झालेल्या पोलिसांनी जमावाच्या कचाट्यातून पोलीस अधिकाऱ्यांना सोडवले. ज्यानंतर जखमी पोलीस अधिकाऱ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अशी घडली घटना –
मिनकपुर भागातील राहणाऱ्या एका रहिवाशाने सांगितले की आरोपी हिरक ज्योति नाथ आणि त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या गटावर हल्ला केला होता. ते म्हणाले की जेव्हा पोलीस आरोपींच्या घरी पोहचले आणि त्यांच्या आई आणि बहिणीला काही प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी पोलिसांवर हल्ला केला.

पुढे त्यांनी सांगितले की आरोपी आणि काही इतर लोकांनी पोलिसांच्या गटावर हल्ला केला. पोलीस अधिकारी आणि एका शिपाई जखमी झाले. त्यानंतर पोलीस स्टेशनमधून आलेल्या एका गटाने त्यांची या जमातून सुटका केली.

गावकऱ्यांचा पोलिसांवर आरोप –
काही गावकऱ्यांना पोलिसांवर आरोप केला की, पोलीस दारुच्या नशेत होते आणि महिलेला छेडत होते. तसेच त्यांचा काही लोकांनी वाद देखील झाला. या प्रकरणी पोलिसांनी आता अनेक लोकांना ताब्यात घेतले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –