जेव्हा ऋषी कपूर म्हणाले-‘कपूर लोगों पे टाईम भारी है’ ! पोस्टमध्ये व्यक्त केली होती ‘चिंता’

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडमधील महान स्टार ऋषी कपूर यांनी गुरूवारी (दि 30 एप्रिल) जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर पूर्ण कपूर कुटुंब आता दु:खात आहे. त्यांच्या जाण्यानं साऱ्यांनाच धक्का बसला आहे. अलीकडेच त्यांची एक जुनी पोस्ट सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे ज्यात त्यांनी लिहिलं होतं, कपूर लोगों पे टाईम भारी है.

गेल्या काही दिवसांपासून देशात लॉकडाऊन लागू आहे. ऋषी यांनी याबद्दल अनेकदा ट्विट केलं आहे. याच काळात सिंगर कनिका कपूरला कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. ही बातमी समोर आल्यानंतर ऋषी कपूर यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यांनी 20 मार्च 2020 रोजी या संदर्भात एक ट्विट केलं होतं. यात एका बाजूला कनिका कपूरचा फोटो होता आणि दुसऱ्या बाजूला राणा कपूरचा.

या पोस्टमध्ये ऋषी यांनी लिहिलं होतं की, “आजकल कपूर लोगों पे टाईम भारी है. भीती वाटते. हे मालिक रक्षा कर दुसऱ्या कपूरांचीही. काही चुकीचं काम कधी होऊ नये. जय माता दी.” त्यावेळी ऋषी यांच्या या ट्विटची खूप चर्चा होताना दिसली होती.