आपल्याला कोणतं सरकार हवं ? नवीन योजना आणणारं की घोटाळे करणार

नितीन बानगुडे यांचा आघाडीला टोला

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्याला कोणतं सरकार हवं आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन योजना आणणारं का? की प्रत्येक आठवड्याला घोटाळा करणार सरकार, असे शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे पाटील यांनी म्हंटले आहे. आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने आज शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांयकाळी ५ वाजता कोल्हापुरात आंबाबाईचे दर्शन घेऊन फोडला आहे. जिल्ह्यातील तपोवन मैदानावर युतीच्या सभेचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे, शिवसेनेचे उमेदवार आणि आमदार तसेच चंद्रकांत पाटील, रामदास आठवले आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अंबाबाईवर श्रद्धा होती. बाळासाहेब ठाकरेही नेहमी प्रचाराची सुरुवात कोल्हापुरातून करायचे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापुरात आंबाबाईचे दर्शन घेऊन फोडला आहे. कोल्हापुरातील तपोवन या मैदानावर युतीच्या सभेचे नियोजन करण्यात आले होते. त्यावेळी आपल्याला कोणतं सरकार हवे आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन योजना आणणारं का? की प्रत्येक आठवड्याला घोटाळा करणार सरकार. असे शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे पाटील यांनी म्हंटले आहे.

याचबरोबरोबर काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष जातीयवादी आहेत. गेल्या ५० वर्षात म्हणजेच त्यांचे सरकार होते त्यावेळेस देशात किती जाती-जातींमध्ये दंगली झाल्या आहेत आणि या ५ वर्षात किती दंगली झाल्या आहेत याचाही तुम्ही विचार करावा असेही त्यांनी म्हंटले. तसेच आगामी निवडणूकांमध्ये युतीचे जितके उमेदवार आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उभे आहेत आपल्याला त्यांना निवडणून द्यायचे आहे असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, युतीच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले असून सभेला राज्यभरातून कार्यकर्ते उपस्थित झाले होते. याचबरोबर शहरातील प्रमुख चौकात स्क्रीन्स लावण्यात आल्या होत्या.