जो म्हणतो भारतापासून ‘स्वातंत्र्य’ पाहिजे, त्याला जेलमध्ये टाका, 2 दिवसात बंद होईल ‘शाहीनबाग’चं आंदोलन : सलमान खुर्शीद

फर्रुखाबाद : वृत्त संस्था – आपल्या निवासी क्षेत्रात आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे की, शाहीनबागचे आंदोलनकर्ते खुप समजदार लोक आहेत आणि त्यांच्यात खुप हिम्मत आहे. आम्ही त्यांना सहकार्य करण्यास तयार आहोत. शाहीनबागचा रस्ता तर पोलिसांनी बंद केला आहे.

खुर्शीद म्हणाले की, जे म्हणत आहेत की आम्हाला भारतापासून आझादी हवी आहे, त्यांना जेलमध्ये पाठवा आणि जे मागसलेपणापासून आझादी म्हणतील, त्यांना प्रेमाने जवळ घ्या. यानंतर बघा दोन दिवसात शाहीन बागचे आंदोलन बंद होईल.

ते म्हणाले की, आम्ही त्यांना सहकार्य करण्यास तयार आहोत, परंतु ते ‘सेहरा’ वर करण्यास तयार नाहीत. तर रामराज्याच्या कल्पनेवर ते म्हणाले, आम्ही रामराज्याला विरोध करत नाही, उलट रावणराज्याला विरोध करतो.

खुर्शीद यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भारत दौर्‍याबाबत म्हटले की, कोणाचेही सरकारी पैशाने स्वागत करणे योग्य नाही. हे सुद्धा महत्वाचे आहे की, येणारा आम्हाला काय देऊन जाणार आहे. यावर सुद्धा होणे गरजेचे आहे. जर आपली अपेक्षा पूर्ण होणार असतील तर स्वागत केले पाहिजे.