नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळच्या ऊर्जामंत्र्यांनी 30 महिन्यात 34 वेळा आपल्या गाडीचे टायर बदलल्याची माहिती समोर आली आहे. आरटीआयमध्ये मागवण्यात आलेल्या माहितीमधुन हि माहिती समोर आली आहे. ऊर्जामंत्री आणि माकपचे नेते एम.एम. मणी यांनी खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे 30 महिन्यात 34 वेळा आपल्या गाडीचे टायर बदलले.
धनराज पिल्लई यांनी अर्ज केला केला असता त्यांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत हि माहिती प्राप्त झाली आहे. पिल्लई हे कोचीमधील रहिवासी असून त्यांनी अनेकदा सामाजिक प्रश्नांवर याचिका देखील दाखल केल्या आहेत. मात्र दोन वर्षात इतक्या वेळा टायर बदलल्याचे पाहून मला धक्का बसल्याचे पिल्लई यांनी म्हटले.
त्यानंतर आता केरळमध्ये याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली असून अनेक जणांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे तर काही जणांनी त्यांची टिंगल केली आहे. दरम्यान, आपण या कालावधीत डोंगराळ भागातून 1 लाख 24 हजार 75 किलोमीटर इतका लांब प्रवास केल्याने गाडीचे टायर खराब झाल्याचे स्पष्टीकरण मणी यांनी दिले आहे.
Visit : Policenama.com
- ‘हे’ १० पदार्थ आहेत अतिशय उपयुक्त, शरीरातील निकोटीन होईल ‘फ्लश आऊट’! –
- उपवास करणे फायद्याचे, पण या लोकांनी करू नये, अन्यथा होईल नुकसान ! –
- ‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
- तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
- मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
- संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –