मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, 2 महिलांसह 5 जण जणांचा जागीच मृत्यू

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारचा भीषण अपघात होऊन पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात दापचरी येथे झाला. भरधाव वेगातील कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हाडरवर धडकली. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. शुक्रवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच तलासरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मुंबईहून सुरतकडे जाणाऱ्या कारवरील चालकाने नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरवर आदळली. त्यामुळे कार विरुद्ध मार्गावर जाऊन पलटी झाली. अपघात एवढा भीषण होता की, कारमधील पाच जण जागेवरच ठार झाले. कारने दोन तिनदा पटली झाल्यानं कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. त्यामुळे गाडीत बसलेले चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून हे सर्वजण नालासोपारा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मृतांचे नातलग आल्यानंतरच त्यांची ओळख पटू शकले, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरातील हा दुसरा अपघात असून पुणे-बंगळुरू महामार्गावर साताऱ्याजवळ भरधाव कारने तीन दुचाकींना उडवलं. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सातारा तालुक्यातील वळसे गावाजवळ सकाळी दहाच्या सुमारास झाला. राजेंद्र घाडगे (रा. समर्थगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर इतर दोनजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.