Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चा धोका कायमच ! 24 तासात 5 हजाराहून जास्त नवे पॉझिटिव्ह तर 224 जणांचा मृत्यू
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात गेल्यात 24 तासांत कोरोना संसर्गामुळे आणखी 224 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा 9 हजार 250 इतका झाला आहे. राज्यात आज 5 हजार 134 नवीन रुग्णांची भर पडली असून दिलासा देणारी बाब म्हणजे 3 हजार 296 रुग्ण कोरोनावर मात करून आज घरी परतले आहेत. आतापर्यंत राज्यात 1 लाख 18 हजार 558 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात गेल्या काही दिवस 6 हजारावर कोरोना रुग्णांची दररोज भर पडत होती. त्यामध्ये आज किंचित घट झाली.
राज्यात आज 5134 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 217121 अशी झाली आहे. आज नवीन 3296 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 118558 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 89294 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) July 7, 2020
गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 5134 रुग्ण आढळून आलेत. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 17 हजार 121 एवढी झाली आहे. गेल्या 24 तासात 224 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात मृत्यूचा आकडा 9250 इतका झाला आहे. सध्या राज्यामध्ये 89294 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
5134 new #COVID19 positive cases, 3296 discharged and 224 deaths in Maharashtra today. The total number of positive cases in the state stands at 2,17,121 including 1,18,558 recovered, 9250 deaths & 89,294 active cases: Public Health Department, Maharashtra pic.twitter.com/IGE0YTI61V
— ANI (@ANI) July 7, 2020
राज्यातील कोविड मृत्यूदर 4.26 टक्के आहे. देशाच्या मानाने महाराष्ट्राचा मृत्यू दर अजूनही चढा आहे. देशाचा विचार केला तर सरासरी कोविड मृत्यू दर 2.98 वर आला आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून नवीन रुग्ण 20 हजारांच्या वर आहेत. गेल्या 24 तासात 24 हजार 248 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 425 जणांचा मृत्यू झाला आहे.