.. म्हणूूनच कार्यकर्ते राजीनामा देत आहेत, खडसे यांचा भाजपवर हल्लाबोल

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यभरात भाजपाचे (BJP) कार्यकर्ते नाराज आहेत. म्हणूनच ते राजीनामे देत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपवर केली आहे. अहमदगरमध्ये श्रीरामपूर तालुक्यासह भाजपच्या 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.

खडसे सोमवारी सकाळी जळगावात त्यांच्या मुक्ताई निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी खडसेंना अहमदनगर जिल्ह्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता, खडसे म्हणाले, की संपूर्ण राज्यात भाजपच्या कार्यकर्ते राजीनामे देत आहेत. हे कार्यकर्ते नाराज असल्यानेच ते राजीनामे देत आहेत, असे ते म्हणाले.

अहमदनरमध्ये भाजप धुसफूस चव्हाट्यावर

अहमदनगर जिल्हा भाजपा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी बंड पुकारला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भाजपच्या 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. एवढंच नाहीतर श्रीरामपूर तालुक्यातील सदस्यांनी राजीनामा देऊन संचालन समिती स्थापन करत वेगळी चूल मांडली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर मनमानी कारभार करत असून पक्षाची ध्येयधोरणे न राबवता मनमानी कारभार करत असल्याचा निषेध करण्यात आला आहे.