मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. या भागातील परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
सध्याची पूरस्थिती पाहता तेथील नागरिकांचा प्रश्न गंभीर आहे मात्र भाजपा सरकारला आणि या मंत्र्यांना जनतेशी काहीही देणं घेण नाही.यांच्या निवडणुकीत जागा किती येणार असे आकडेही ठरले आहेत. तुम्ही पुरात अडका किंवा दुष्काळात लटका आम्हाला काय करायचंय, अशीच सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे.
पावसाचे पाणी ओसरल्यानंतरही रोगराई आणि तेथील जनजीवन सुरळीत करण्याचा मोठा प्रश्न आहे. कोल्हापूर, सांगली आणि आजुबाजूचा परिसर आटोक्यात येण्यासाठी किमान ६ महिन्यांचा कालावधी जाईल. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुका पुढे ढकलाव्यात. त्यासाठी मी निवडणूक आयोगाला पत्रही लिहिणार असल्याचे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
महिन्याभरात आचारसंहिता लागली तर सरकार अजिबात पूरग्रस्तांना मदत करणार नाही, त्यामुळे निवडणूक पुढील वर्षी घ्याव्यात अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोग या मागणीवर काय प्रतिक्रिया देणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
- जास्त ‘चहा’ पिता ? तर तुमच्यासाठी आहे ‘ही’ बातमी, ‘कँसर’शी आहे कनेक्शन
- ‘डेंटल डॅम’ म्हणजेच तोंडाचा कंडोम तुम्हाला माहिती आहे का ?
- केमिकलचा वापर न करता पांढरे केस करा काळे
- पावसाळ्यात बाळाच्या नॅपी रॅशेसच्या समस्येचे ‘हे’ आहे घरगुती उपाय
- जाणून घ्या – ‘हिमोफेलिया’ होण्याची कारणे आणि प्रकार
- ‘ही’ भाजी खा आणि वाढवा लैगिंक क्षमता
- प्रेग्नेंसीमध्ये अॅस्ट्रोजनचे प्रमाण वाढल्याने निर्माण होतो ‘हा’ धोका
- Liquid vs Pencil Eyeliner : जाणून घ्या कशी करावी लायनरची निवड.
- लघवी करताना जर त्रास होत असेल तर ‘हे’ उपाय करा
- दूध – हरभरा – हळद पॅकमधून मिळवा गोरी त्वचा, ‘असा’ तयार करा पॅक ; जाणून घ्या