Ayodhya Verdict : निकालाचं काँग्रेसकडून स्वागत, आता राजकारणासाठी रामाच्या नावाचा वापर थांबेल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आयोध्या प्रकणाचा निकाल आज सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यीय खंडपीठाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निकालाचे देशभरातून स्वागत केले जात आहे. आयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी मोक्याची पाच एकर जागा द्यावी असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटलं आहे. कित्येक दशकांपासून न्यायालयात अयोध्या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. या प्रकरणी न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे.
Randeep Surjewala, Congress on #AyodhyaVerdict: Supreme Court's verdict has come, we are in favour of the construction of Ram Temple. This judgement not only opened the doors for the temple's construction but also closed the doors for BJP and others to politicise the issue. pic.twitter.com/N1qr6FD1We
— ANI (@ANI) November 9, 2019
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी निकालानंतर पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता राजकारणासाठी रामाच्या नावाचा वापर थांबेल. तसेच या निर्णयाचं काँग्रेस स्वागत करत आहे असे रणजीत सुरजेवाला यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. आम्ही राम मंदिर बांधण्याच्या बाजूने आहोत. या निर्णयाने फक्त राम मंदिर उभारणीचे दरवाजे खुले झाले नाहीत, तर राम मंदिराच्या मुद्यावरुन राजकारण करण्याचे दरवाजे बंद झाले आहेत, असे सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
#WATCH Randeep Surjewala,Congress on being asked by media if Temple should be constructed on Ayodhya site: Supreme Court ka nirnay aa chuka hai, svabhavik taur pe aapke sawal ka jawab haan mein hai, Bhartiye Rashtriye Congress Bhagwan Shri Ram ke Mandir ke nirman ki pakshdhar hai pic.twitter.com/vkg3Z1xGlA
— ANI (@ANI) November 9, 2019
रामजन्मभूमीच्या निर्णयाचे ‘श्रेय’ कोणीही घेऊ नये –
सर्वोच्च न्यायालयाच्या आयोध्या प्रकरणी दिलेल्या निकालाचा काँग्रेस सन्मान करते. हा निकाल एक प्रकारे श्रद्धा व विश्वासाचाही सन्मान आहे. सर्व समजाघटकांनी न्यायालयाचा निकाल मान्य करून शांतता राखावी. देशातील परस्पर सौहार्द व एकतेची परंपरा जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. रामजन्म भूमीच्या निर्णयाचे श्रेय कोणतीही व्यक्ती, पक्ष किंवा संघटनेने घेण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही राम मंदिर बांधण्याच्या बाजूने असल्याचे सुरजेवाल यांनी म्हटले आहे.
Visit : Policenama.com
- अचानक ‘गोड’ किंवा ‘जंकफूड’ खाण्याची इच्छा हे ‘टेन्शन’चे लक्षण, जाणून घ्या अन्य लक्षणे
- जास्त ‘प्रोटिन्स’चा होतो ‘किडनी’वर परिणाम, असे ओळखा प्रोटिन्सचे प्रमाण
- भरपूर खा…आणि वजनही ठेवा नियंत्रणात, जाणून घ्या पद्धत
- ‘स्मोकिंग’च्या सवयीने त्रस्त आहात का ? योगा करा आणि सोडवा व्यसन
- कॅटरिनासारखी ‘टॉवेल एक्झरसाइज’ करा आणि ‘स्लीम’ व्हा
- शांत झोप येत नाही का ? मग आहारात ‘हे’ आवश्य घ्या, जाणून घ्या
- चालण्याचे ‘हे’ आहेत ५ मोठे फायदे, तूम्हाला माहित आहेत का ? जाणून घ्या