Bacchu Kadu | बच्चू कडू असं का म्हणाले? ‘नवाब मलिकांना जर अजित पवार…तर खरा पिक्चर?’

नागपूर : Bacchu Kadu | अजित पवार (Ajit Pawar) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. नवाब मलिक उद्या म्हणाले की, मला अजित पवारांसोबत जायचे आहे आणि अजित पवार जर म्हणाले की नाही घेत त्यांना तर खरा पिक्चर सुरु होईल. त्या पक्षाची धोरणे सांभाळायची आहे. नवाब मलिकचा विषय फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा आहे. मी त्यांच्या मनातले कसे काय सांगणार? अशी प्रतिक्रिया नवाब मलिक प्रकरणावर आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दिली आहे.

बच्चू कडू म्हणाले, महायुती सरकारमध्ये सगळे काही आलबेल आहे. आम्ही १५० होतो आता २०० झालो आहोत. मंत्रिमंडळाचा विस्तार वगैरे चुलीत घाला. मला काही घेणेदेणे नाही. (Bacchu Kadu)

देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले आणि सध्या बाहेर आलेले नवाब मलिक हे गुरुवारी अधिवेशनादरम्यान, सभागृहात सत्ताधारी बाकांवर बसले होते. यामुळे महायुती सरकारवर प्रचंड टीकेची झोड उठली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना जाहिर पत्र लिहून नवाब मलिक आपल्यासोबत नकोत, असे म्हटल्याने अजित पवार अडचणीत सापडले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Winter Session 2023 | कांदा निर्यातबंदी, इथेनॉल निर्मितीवरील बंदीबाबत अजित पवार सभागृहात म्हणाले, ”गरज पडल्यास…”

Shweta Tiwari Hot Photo | श्वेता तिवारीच्या मादक अदेवर चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो..

किराणा माल विक्रेत्या व्यावसायिकाची 10 लाखांची फसवणूक, हडपसर परिसरातील प्रकार

Ajit Pawar | नवाब मलिकांसंदर्भातील फडणवीसांच्या पत्रावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले – ”त्या पत्राचे काय करायचे ते…”

Pune Crime News | जास्तीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ महिलेची फसवणूक, येरवडा परिसरातील प्रकार