देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का ! जलयुक्त शिवार ‘अपयशी’ ठरल्याचा कॅगचा ठपका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार ही योजना अपयशी ठरल्याचे ‘कॅग’कडून नमूद करण्यात आले आहे. या योजनेवर 9634 कोटी रुपये खर्च करुनही पाण्याची गरज भागवण्यात व भूजल पातळी वाढवण्यात अपयश आल्याचे ‘कॅग’ने म्हटले आहे. ‘कॅग’चे हे ताशेरे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. जलयुक्त शिवार ही देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना होती. तत्कालीन सरकारकडून या योजनेचा मोठा गाजावाजाही करण्यात आला होता. मात्र, आता ‘कॅग’ने या योजनेमुळे मूळ उद्दिष्टांची पूर्ती झालीच नसल्याचे म्हटले आहे.

जलयुक्त शिवार योजनेवर ‘कॅग’ने ओढलेले ताशेरे

– या योजनेसाठी जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील दुष्कळमुक्त करण्याचे उद्दिष्ट सफल न झाल्याचा ‘कॅग’चा ठपका

– ह अभियान राबवलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यात अपयश आल्याचा ‘कॅग’चा निष्कर्ष

– अभियान राबवलेल्या गावात पिण्याचे पाण्याची गरज भागवण्यासाठी टँकर सुरु असल्याचे कॅगने आणले निदर्शनास

– जलयुक्त शिवारच्या कामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी कोणतीही कार्यपद्धती अवलंबली नाही.

– जलयुक्त शिवार योजनेतंर्गत कॅगने पाहणी केलेल्या 120 गावापैकी एकही गावामध्ये दुरुस्ती व देखभालीसाठी राज्य सरकारने अनुदान दिले नाही.

– चार जिल्ह्यांमध्ये अहमदनगर, बीड, बुलढाणा, सोलापूर या जिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामे योग्य प्रकारे झाली नाही. या कामासाठी 2617 कोटी रुपयांचा खर्च झाला होता.

– जलयुक्तची अनेक काम निकृष्ट झाला असल्याचा ‘कॅग’चा ठपका. पाण्याची साठवण निर्मिती कमी असतानाही गावे जलपरिपूर्ण म्हणून घोषित केल्याचा ‘कॅग’चा ठपका.

– जलयुक्त शिवार योजनेचे मुख्य उद्दिष्ट भूजल पातळीत वाढ करणे होते. पण अनेक गावामध्ये वाढ होण्याऐवजी भूजल पातळी घटल्याचे ‘कॅग’च्या निदर्शनास आले.

– या योजनेतंर्गत केलेल्या कामाची छायाचित्रे संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली नाहीत. अनेक कामांचे त्रयस्थ संस्थेकडून मूल्यमापन झाले नाही.