अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपात आल्यामुळे त्यांनीच पक्षाचे उमेदवार निवडणूकीत पराभूत करण्यासाठी खोड्या काढल्या. त्यांच्यामुळेच पक्षाच्या जागा कमी झाल्या, असा आरोप माजी मंत्री राम शिंदे यांनी भाजप पराभूतांच्या बैठकीत केला. पक्षनिरीक्षक अशिष शेलार हे विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेण्यासाठी नगर येथे आले होते. त्यावेळी शिंदे हे बोलत होते.
शिंदे म्हणाले की, निवडणुकीत विखेंनी सांगितलं होतं की ही भाजपच्या आमदारांची संख्या 12 करू मात्र तसं काहीही झालेलं नाही. विखे यांची फार काही मोठी ताकद नव्हती. उलट त्यांची पूर्वापार परंपरा राहिली आहे की ते ज्या पक्षात जातात त्या पक्षात खोड्या करतात. त्या पक्षासाठी हानीकारक वातावरण निर्माण करतात. ते पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलं आहे.
राम शिंदे यांनी विखे यांच्यावर टीका केल्याने भाजपातील पक्षांतर्गत बंडाळी चव्हाट्यावर आली आहे. याबाबत पक्षनेतृत्व नेमका काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/
- ‘वजन घटवताना अवेळी भूक लागते का? ‘या’ ४ पद्धतीने करा नियंत्रण
- वजनाचा तोल सांभाळण्यासाठी शिका कॅलरीचे गणित, ‘या’ १४ गोष्टी लक्षात ठेवा
- रक्तदाबाची सामान्य पातळी किती? सुमारे ५० टक्के लोक अनभिज्ञ
- हायपरटेन्शन आजाराची ‘ही’ आहेत ७ लक्षणे, आणि ४ गंभीर परिणाम
- तुम्ही अशाप्रकारे झोपता का? जाणून घ्या ४ योग्य-अयोग्य पद्धती