जालना : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपला सत्तेपासून दूर करत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यानंतर तीन चाकांचे हे सरकार फारकाळ टिकणार नसल्याची टीका भाजप नत्यांकडून होत आहे. तर भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी याच मुद्यावरून ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे.
राष्ट्रवादीचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा जालन्यात सर्वपक्षीय नागरिक सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नेहमीप्रमाणे रावसाहेब दावने यांनी आपल्या शैलीत फटकेबाजी केली. तुमचा अमर, अकबर, अँथनीचा संसार चांगला चालाव. अन्यथा अर्ध्यावरतच डाव मोडला असे म्हणण्याची संधी आम्हाला देवू नका असा खोटक टोला त्यांनी यावेळी लगावला.
तसेच तुमचा सारा खेळ खेळून घ्या. आम्ही तुमच्यासमोर अडथळे निर्माण करणार नाही. मात्र, तुमच्यातचं अडथळे निर्माण होऊ देऊ नका, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला. चित्रपट, राजकारण आणि क्रिकेटमध्ये आपल्याला संधी मिळावी असे सर्वांनाच वाटत असते. मात्र, चित्रपटात रिटेक करता येतो तर क्रिकेटमध्ये सरावर करता येतो. पण राजकारणात असे काही होत नाही. कारण येथे जसा बॉल आला तसा टोलवावा लागतो, असे म्हणत दानवे यांनी ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतला.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- झोपण्यापूर्वी ‘मोबाईल चेक’ करण्याच्या सवयीमुळे होतात ‘हे’ 6 धोके
- ‘चॉकलेट’ च्या पसंतीवरून समजते तुमचे व्यक्तिमत्व, ‘हे’ 5 प्रकार लक्षात ठेवा
- रिकाम्यापोटी चहा घेण्याचे ‘हे’ 4 धोके! वेळीच व्हा सावध!
- लाल कांद्याचे ‘हे’ 5 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?
- ‘हेल्दी लिव्हर’ साठी ‘या’ 4 पदार्थांचा आहारात करा समावेश
- तणावग्रस्त असणार्यांनी करावेत ‘हे’ 5 उपाय, जाणून घ्या फायदे
- हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी ‘या’ 4 तपासण्या करा ! जाणून घ्या 6 लक्षणे