नगर जिल्ह्यात झालेलं पक्षाचं नुकसान भरून काढण्यासाठी भाजप करणार ‘हे’ काम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांना भाजप घेतऊन नगरमधील भाजपची ताकद वाढवली. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राधाकृष्ण विखे-पाटील यांना भाजपने पक्षात प्रवेश देऊन नगर जिल्ह्यातील भापची ताकद आणखीनच वाढवली. भाजपने विखे-पाटील पिता पुत्रांना भाजपमध्ये घेऊन पक्षविस्तार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षीत यश मिळाले नाही.

पक्षाला जिल्ह्यात नुकसान सहन करावे लागले. हे नुकसान भरुन काढण्यासाठी भाजपने नवीन शक्कल लढवली आहे. तत्कालीन काँग्रेस नते राधाकृष्ण विखे पाटील यांचा पक्षाला फायदा होईल या उद्देशाने त्यांना भापजमध्ये घेतले. तर मधुकर पिचड यांना देखील आमदार पुत्रासह भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. मात्र, यातून काहीही साध्य झाले नाही. जिल्ह्यात पूर्वी भाजपचे पाच आमदार होते. विखे पिता पुत्रांमुळे सात व्हायला हवी होती. मात्र, प्रत्यक्षात ही संख्या तीनवर आली.

त्यात भाजपचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, अहमदनगरमध्ये पक्षाचे झालेलं नुकसान कमी करण्यासाठी भाजप कार्यकारणीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी जिल्हा भाजपमध्ये दोन जिल्हाध्यक्ष देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार शहर आणि ग्रामीणसाठी दोन जिल्हाध्यक्ष राहणार आहेत. अध्यक्षांची निवड प्रदेश पातळीवर घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/