तूर्त मुंबईहून कोल्हापूरकडे प्रवासी पाठवू नका, गृहराज्यमंत्रयाचे पोलीस महासंचालकांना पत्र

सतेज पाटील

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउनमुळे दिवसेंदिवस मुंबईहून झपाट्याने येणार्‍या प्रवाशांचा भार कोल्हापूरमध्ये वाढल्याने तब्बल 86 हजार रुग्णांच्या तपासणी करण्याचे काम प्रलंबित आहे. अशात नव्याने प्रवाशांची भर पडणे हो सोसणारे नाही. त्यामुळे मुंबईतून कोल्हापूरला येण्यासाठी काही दिवस परवानगी देऊ नये, अशी मागणी कोल्हापूरचे पालकमंत्री व राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पत्राद्वारे केली आहे.

सरकारने राज्यातील लोकांनाही त्यांच्या मूळ गावी जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे या ‘रेड झोन’ भागातील हजारो लोक कोल्हापूरकडे येत आहेत. या प्रवाशांच्या वाहनांची लांबलचक रांग वारणा नदी पुलाजवळ लागली आहे. दररोज हजारोंच्या संख्येने येणार्‍या प्रवाशांमुळे कोल्हापुरातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडू लागला आहे. त्यामुळे चार दिवस रेड झोन आणि मुंबई पुण्यावरून येणार्‍या प्रवाशांना कोल्हापूरला पाठवू नये पाटील यांनी केली आहे. मुंबई आणि पुण्यावरून आत्तापर्यंत 86 हजार लोक कोल्हापुरात दाखल झाले आहेत. मुंबईतमधून आलेल्या 12 जणांना बाधा झाली आहे. प्रत्येक प्रवाशाची आरोग्य तपासणी करून त्यांच्या विलगीकरणाबाबत निर्णय घेतला जात आहे. यामुळे प्रयोगशाळांवरचा ताण कमालीचा वाढला आहे. त्यामुळे आधीचे रिपोर्ट येईपर्यत रेड झोन व मुंबई पुण्याच्या नागरिकांनी थोडा संयम राखावा, असे आवाहन सुद्धा सतेज पाटील यांनी केले आहे.