मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य पोलिस दलातील अधिकारी तसेच कर्मचार्यांच्या बदल्या करण्यासाठी शासनानं यापुर्वी दि. 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. शासनानं ती मुदत वाढवली असून अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्या 30 ऑक्टोबर पर्यंत कराव्यात असं सांगितलं आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं सालाबादाप्रमाणे होणार्या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्या प्रलंबित आहेत.
राज्य सरकारनं आज काढलेल्या आदेशान्वये पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांच्या बदल्यांना पंधरा दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. शासनाने यापुर्वी दि. 15 ऑक्टोबर 2020 पर्यंत अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्यांना मुदत दिली होती. त्यामध्ये वाढ करण्यात आली असून आता पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्या 30 ऑक्टोबरपर्यंत करण्यात येणार आहेत.