नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईकनंतर विरोधी पक्षनेते त्याचे पुरावे मागत आहेत. त्यावरून मोदींवर टीका करत आहेत अशातच आता पुरावाच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केल्याचे समोर आले आहे. पुरावाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्यावर गिरीराज सिंह यांनी आपली तोफ डागली आहे. राहुल गांधी हे खरे देशभक्त आहेत का ? देशालाही याचे पुरावे हवे आहे असे म्हटले आहे. गिरीराज सिंह यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. राहुल गांधींनीही देशभक्त असल्याचा पुरावा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधत त्यांनी एअर स्ट्राईकचे पुरावे द्यावेत अशी टीका केली होती. याच पुराव्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींच्या वक्तव्याचा गिरीराज सिंह यांनी समाचार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. गिरीराज सिंह आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “राहुल गांधी देशभक्त आहेत की नाही? आज देशालाही याचे पुरावे हवे आहेत. देश म्हणजेच मी इथे भारत असे म्हणत आहे.” असे ट्विट करत गिरीराज सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे.
राहुल गांधी देश भक्त है या नहीं?? आज देश को सबूत चाहिए।
"देश" का तात्पर्य हिन्दुस्तान से है।
— Shandilya Giriraj Singh (@girirajsinghbjp) March 4, 2019
यापूर्वीही गिरीराज सिंह यांनी पुरावे मागणाऱ्यांना ट्विट करत टार्गेट केले होते. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, “ज्यांना पुरावे हवे आहेत त्यांनी मसूद अजहरच्या कबरीत घुसून पुरावे मागावेत. आता एअर स्ट्राईक नंतर देशातील गद्दारांवर सर्जिकल स्ट्राईक होईल.” असे गिरीराज सिंह यांनी म्हटले होते.
अब जिनको एयर स्ट्राइक का सबूत चाहिए वह अजहर मसूद के कब्र में घुसकर उससे सबूत मांगे.. अब देश के अंदर के गद्दारों के ऊपर सर्जिकल स्ट्राइक होगी!
— Shandilya Giriraj Singh (@girirajsinghbjp) March 4, 2019