नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील कानपूरमध्ये एक थरारक घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नीची आणि तिच्या प्रेमीची धारधार शस्त्राने वार करून हत्या केली. कानपुर मधील नरोरा गावात हि घटना घडली असून यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नरौरा गावात राहणाऱ्या राजेश कुरील याला आपली पत्नी आणि आपला आतेभाऊ मनीष यांचे अवैध संबंध असल्याचा संशय होता. मात्र त्याच्याकडे पुरावा नसल्याने तो शांत होता. या कारणावरून त्याचे पत्नीबरोबर अनेकदा भांडण होत असे. यामुळे अनेक दिवस मनीष त्याच्या घरी आला नव्हता. खूप दिवसांनी तो त्याच्या घरी आला मात्र यावेळी राजेश तयारीनिशी बसला होता.
संध्याकाळी जेवण झाल्यानंतर सर्व लोकं झोपी गेले होते. त्यानंतर सर्व जण झोपी गेल्याचे पाहून मनीष आणि सुनीता हे दोघेही आपत्तीजनक स्थितीत झोपले. त्यानंतर या दोघांना या अवस्थेत पाहून राजेशने घरातील धारधार हत्याराने या दोघांचीही हत्या केली. त्यानंतर तो स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याने आपला गुन्हा कबुल केला.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी राजेशला या प्रकरणी अटक केली असून मृतदेहांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
visit : Policenama.com
- रूबाबदार व्यक्तीमत्वासाठी पुरूषांनी फॉलो करावा ‘हा’ पारंपारिक ‘फॉर्मूला’
- पुरूषांनी ‘या’ १० गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास बिघडू शकते आरोग्य, अशी घ्या काळजी
- ‘सेक्स पॉवर’ वाढविण्यासाठी पुरूषांनी ‘हे’ सेवन करावे, अशी आहे पद्धत
- सावधान ! जेवणानंतर थंड पाणी पिताय का ? रोग प्रतिकारकशक्ती होते कमी
- ‘या’ व्यायामाने कर्करोग रूग्णांच्या आयुष्यामानात होतो सकारात्मक बदल
- अशी ओळखा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी, जाणून घ्या पद्धत
- तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी करा ‘हे’ खास घरगुती उपाय, जाणून घ्या
- ‘या’ सेक्ससंबंधीच्या समस्यांपासून ‘कंडोम’ देखील वाचवू शकत नाही, जाणून घ्या
- ‘हे’ व्यायाम प्रकार करा आणि पळवून लावा ‘गुडघेदुखी’ ! जाणून घ्या