IAS Suhas Diwase On Pune Lok Sabha Election | राजकीय कार्यकर्त्यांनी लावलेले बोर्ड, बॅनर चोवीस तासात काढून घ्या – सुहास दिवसे
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – IAS Suhas Diwase On Pune Lok Sabha Election | राजकीय कार्यकर्त्यांनी लावलेले बोर्ड, बॅनर चोवीस तासात काढून घ्या..भिंतीवर काही लिहिले असेल तर स्वच्छ करा..अन्यथा ते प्रशासनामार्फत काढून टाकले जाईल. त्याचा खर्च तुमच्याकडून वसूल केला जाईल आणि गुन्हेही दाखल करू असा इशारा जिल्हाधिकारी आणि पुणे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी सुहास दिवसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला आहे. एवढेच न्हवे तर यापूर्वीच्या निवडणुकीत आलेल्या तक्रारींवर प्रशंसनाकडून कोणती कारवाई करण्यात आली? याचा अहवाल देखील येत्या दोन तीन दिवसात जाहीर करण्यात येईल असे सांगत आगामी निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यात येतील असा दावाही दिवसे यांनी यावेळी केला. (IAS Suhas Diwase On Pune Lok Sabha Election)
पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती (Baramati Lok Sabha), शिरूर (Shirur Lok Sabha) आणि मावळ मतदार संघामध्ये (Maval Lok Sabha) आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar), पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त चौबे (IPS Vinay Kumar Choubey), अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी (IAS Kavita Dwivedi), पीएमआरडीए चे अतिरिक्त आयुक्त सिंगला (IAS Deepak Singla), जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (IPS Pankaj Deshmukh) आदी उपस्थित होते.
सुहास दिवसे तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हयातील चारही लोकसभा मतदार संघांमध्ये असलेली मतदान केंद्र, पोलीस बंदोबस्त, मतदान आणि मतमोजणीची तयारी याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरेही अधिकाऱ्यांनी दिली. आचारसंहितेमुळे राजकीय फलक आणि भित्तिचित्रे हटवण्याची कारवाई स्थानिक प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र निवडणुकीत गुन्हेगारी वृत्तीची मंडळी कार्यरत राहून मतदारांवर दबाव टाकतात, पोलिसांच्या साक्षीने पैशांचे वाटप होते अशा तक्रारी मागील काही निवडणुकीतही केल्या गेल्या आहेत. बोर्ड, बॅनर आणि भित्तिचित्रे काढून करण्यात येणाऱ्या प्रचारामुळे शहरात विद्रुपीकरण होत आहे. यानंतर ही पोलिसांकडून कायद्याचा वापर होत नाही. यापूर्वीच्या नी डणुकांमध्ये यासंदर्भात आलेल्या तक्रारींचे पुढे काय झाले ? याची माहिती दिली जात नाही असे प्रश्न यावेळी पत्रकारांनी उपस्थित केले.
या अनुषंगाने स्पष्टीकरण देताना सुहास दिवसे यांनी सांगितले की,
शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांनी चोवीस तासांत स्वतः फलक काढून घ्यावेत असे आदेश दिले आहेत.
त्यांनी ते काढले नाहीत तर प्रशासनामार्फत ते काढण्यात येतील.
यासाठी येणारा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल. एवढेच न्हवे तर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
यापूर्वी शहरात झालेल्या पोट निवडणुका आणि सार्वत्रिक निवडणुकांमाध्ये निवडणूक
अधिकाऱ्यांकडे विविध माध्यमातून आलेल्या तक्रारींवर प्रशासन आणि निवडणूक आयोगाकडून काय कारवाई
करण्यात आली याची माहिती येत्या दोन तीन दिवसांत आपल्या माध्यमातून देण्यात येईल.
निवडणूक पारदर्शक पणे आणि शांततेत होण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे,
असा दावाही दिवसे यांनी यावेळी केला.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा