देशातील सर्वात ‘भ्रष्ट’ राज्यांची यादी जाहीर, ‘ही’ 8 राज्य भ्रष्टाचारात ‘अव्वल’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्व भ्रष्ट राज्यांची यादी जाहीर झाली आहे. याबाबतचे सर्वेक्षण पार पडले आहे. या सर्वेक्षणात 1 लाख 90 हजार लोकांचा सहभाग होता. त्यानुसार 51 टक्के भारतीयांनी मान्य केले की त्यांनी लाच घेतली आहे. वर्षभरात 51 टक्के लोकांनी भ्रष्टाचार केला. नगरपालिका, पोलीस खाते, मालमत्ता नोंदणी केंद्र या सरकारी ठिकाणी सर्वात जास्त लाच मागिल्याचे प्रकार घडले आहेत. देशातील सर्वात जास्त भ्रष्टाचार करणाऱ्या आठ राज्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश नाही.

पासपोर्ट आणि रेल्वे तिकीटासारख्या अनेक सुविक्षा केंद्र आणि सरकार सुविधा संगणीकृत केल्याने भारतात भ्रष्टाचारात घट झाल्याचे सर्वेक्षणात म्हणले आहे. सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार जास्त होत असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले. देशातील सर्वात जास्त भ्रष्टाचारी राज्यात राजस्थान, बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, तेलंगणा, पंजाब, कर्नाटक, तमिळनाडूचा समावेश आहे.

देशातील सर्वात भ्रष्ट राज्यांची यादी
1) राजस्थान 
78 टक्के नागरिकांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार राजस्थान सर्वात भ्रष्ट राज्य म्हणून पात्र ठरवले आहे. अनेक नागरिकांना त्यांचे काम करुन घेण्यासाठी अधिकाऱ्यांना लाच घ्यावी लागली. तर 22 टक्के लोकांना अनेकदा लाच द्यावी लागली. यातील 56 टक्के लोकांना फक्त एकदा किंवा दोनदा लाच दिली आहे. तर 22 टक्के नागरिक असे आहेत ज्यांनी सांगितले की त्यांना आपले काम पूर्ण करण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार नाही.

2) बिहार
या राज्यातील सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 75 टक्के लोकांनी लाच दिल्याचे मान्य केले. 50 टक्के लोकांना अनेकदा लाच द्यावी लागली. तर 25 टक्के लोकांनी एकदा किंवा दोनदा लाच दिली आहे. 25 टक्के लोकांनी लाच घेतल्याशिवाय आपले काम पूर्ण झाल्याचे सांगितले.

3) झारखंड
या राज्यातील सर्वेक्षणात सहभागी झालेल्या एकूण 74 टक्के नागरिकांना लाच दिल्याचे मान्य केले. त्यांचे काम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी लाच घेतली. विशेष म्हणजे सर्व 74 टक्के लोकांना अनेकदा लाच दिली आहे. तर 13 टक्के लोकांचे लाच न देता काम झाले आहे.

4) उत्तर प्रदेश
या राज्यातील सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 74 टक्के लोकांना सांगितले की आपले काम पूर्ण करण्यासाठी लाच दिली. त्यातील 57 टक्के लोकांनी अनेकदा लाच दिल्याचे सांगितले. तर 17 टक्के लोकांनी एकदा किंवा दोनदा लाच दिल्याचे सांगितले. तर फक्त 3 टक्के लोकांना लाच न देता काम केल्याचे सांगितले.

5) तेलंगणा
या राज्यातील सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 67 टक्के लोकांना अनेक प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी लाच दिल्याचे सांगितले. तर 56 टक्के लोकांना अनेकदा लाच दिल्याचे कबूल केले. 11 टक्के लोकांनी एकदा किंवा दोनदा लाच दिल्याचे सांगितले. 11 टक्के लोकांनी लाच न देता काम केल्याचे सांगितले.

6) पंजाब
या राज्यातील सर्वेक्षणात सहभागींपैकी 63 टक्के लोकांना काम पूर्ण करुन घेण्यासाठी लाच दिल्याचे सांगितले. त्यातील 27 टक्के लोकांनी अनेकदा लाच दिली तर 36 टक्के लोकांनी एकदा किंवा दोनदा लाच दिली, तर 27 टक्के लोकांना लाच न देता काम केले.

7) कर्नाटक
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 63 टक्के लोकांनी अधिकृत काम करुन घेण्यासाठी त्यांना लाच द्यावी लागली. त्यातील 35 टक्के लोकांनी अनेकदा लाच दिल्याचे सांगितले तर 28 टक्के लोकांना फक्त एकदाच किंवा दोनदा लाच दिल्याचे सांगितले. सुमारे 9 टक्के लोकांना लाच न देता काम करुन घेतल्याचे सांगितले.

8) तमिळनाडू
सर्वेक्षणातील एकून 62 टक्के लोकांना सांगितले की त्यांनी सरकारी काम करताना लाच दिली. तर 27 टक्के लोकांनी काम करुन घेण्यासाठी एकदा किंवा दोनदा लाच दिली. फक्त 8 टक्के लोकांनी लाच न देता आपली कामे करुन घेतली आहेत.

Visit : Policenama.com