मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात ठाकरे सरकार येणार हा निश्चित होताच आज विधानभवनात आमदारांच्या शपत विधीला सुरुवात झाली. यावेळी स्वतः सुप्रिया सुळे यांनी उपस्थित राहून विधानभवनात अजित पवार, आदित्य ठाकरे, रोहित पवार यांचे स्वागत केले. यावेळी सुप्रिया सुळे यांना एक फोन आला आणि त्या धावत धावत विधानभवनाच्या बाहेर आल्या. त्यामुळे असे नेमके काय झाले ज्यामुळे खासदार सुप्रिया सुळे धावत पळत आल्या असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं. उद्या उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री पदाची शपत घेणार आहेत. तत्पूर्वी आमदारांना शपत देण्याचे काम सुरु होते अशावेळी सुप्रिया सुळे स्वागताला उभ्या होत्या. अजित पवार येताच सुप्रिया सुळेंनी त्यांचे स्वागत करत गळाभेट घेतली आणि पाया पडून आशीर्वाद देखील घेतले.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी नवनिर्वाचित आमदारांचे स्वागत केले. त्यावेळी तटकरे कुटुंबीय तेथे उपस्थित होते त्यांच्यासोबत सुळे यांचे फोटोसेशन चालू होते. अचानक सुळे यांना कोणाचातरी फोन आला आणि त्या धावत पळत तातडीने विधानभवनाबाहेर आल्या. मात्र तो फोन कोणाचा होता आणि सुप्रिया सुळे एवढ्या तातडीने बाहेर का आल्या याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना सुरवात झाली आहे.
Visit : Policenama.com
- सावधान ! गरम-गरम चहा पिण्याची सवय पडू शकते महागात, ‘हे’ आहेत ३ धोके
- दाट केसांसाठी बहुगुणी आहे आवळा, होतील ‘हे’ ६ फायदे
- सावधान ! ‘या’ ५ गोष्टी वॉशरूममध्ये घेऊन जाऊ नका, जाणून घ्या
- बाळंतपणानंतरचे वजन कमी करायचे आहे का ? ‘हे’ ७ उपाय करा
- अपचन, कंबरदुखी, आणि नैराश्यावर ‘हा’ एकच उपाय, हे आहेत ५ फायदे
- उपवास केल्याने होतात हे १४ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- ‘हे’ असू शकते जुनाट आजाराचे मूळ, वेळीच लक्ष देऊन करा हे उपाय