कॉंग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘मोदी सरकार देशासाठी हानिकारक, 7 वर्षांत अनेक घाव घातले’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रात सत्तेत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपप्रणित एनडीए सरकारला 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि सत्ताधारी भाजप आपली कामगिरी मांडत आहे. तर विरोधी पक्ष काँग्रेसने मोदी सरकारवर Modi government हल्लाबोल केला आहे. केंद्रातील मोदी सरकारला 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. मोदी सरकारने गेल्या 7 वर्षात फक्त अनेक घाव घातले आहेत. जे कधीच भरून निघणारे नाहीत. 7 वर्षांतील बेसुमार बेरोजगारी, महागाई आणि अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळे मोदी सरकार Modi government देशासाठी हानिकारक असल्याचे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी रविवारी (दि. 30) पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. गेल्या 7 वर्षांत आपण लोकशाहीचा सन्मान, घटनात्मक संस्था, सरकारच्या मर्यादा, पंतप्रधानांच्या संवेदना, वेदना आणि वचन पूर्ण करण्याच्या विश्वास गमावला आहे. आपण माणुसकी, स्वावलंबन, जागतिक मूल्ये गमावली आहेत. पंतप्रधानांनी जनतेचा विश्वास आणि आदर गमावला आहे. परंतु आजही ते स्वतःला महान समजतात, अशी टीका सुरजेवाला यांनी केली. तसेच द्वेष आणि फूट, खोटी नोटबंदी आणि जीएसटीची माया, फसवणूक आणि अन्याय. हजारो मृतदेह गंगेमध्ये वाहत आहेत. उन्नाव, प्रयागराज आणि कानपूर येथे जमिनीत मृतदेह पुरले जात आहेत. हे सर्व भारत मातेचे संस्कार अन् संस्कृती असू शकत नाही, असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

Also Read This : 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल; तपास सुरु

लैंगिक संबंध ठेवल्यानंतर कशी आणि किती दिवसात गर्भधारणा होते ? जाणून घ्या

ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर भारतात अ‍ॅस्परगिलोसिसची प्रकरणे आली समोर; जाणून घ्या लक्षणं, कारणे आणि बचावाचे उपाय

शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘… तो Video 2 वर्षांपूर्वीचा, भाजपाने घरगुती वादाचा गैरफायदा घेऊ नये’