Nana Patole On Modi Govt | नरेंद्र मोदी सरकारने मागील 9 वर्षात तब्बल 100 लाख कोटींचे कर्ज ठेवले करुन; नाना पटोलेंचा घणाघात

पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole On Modi Govt | काँग्रेसतर्फे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जनसंवाद यात्रेचे आय़ोजन करण्यात आले आहे. आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली नागपुर येथील कन्हान जिल्हा येथे आज ‘जनसंवाद पदयात्रा’ काढण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यातील भाजपासह नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. पारशिवनी येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींवर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या सरकारने देशात सुईपासून रॉकेट पर्यंतचा विकास केला. चंद्रावर चांद्रयान 3 सोडले त्या इस्रोची स्थापनासुद्धा काँग्रेस सरकारच्या काळातच झाली.

2014 साली भाजपाचे सरकार सत्तेवर आले पण या सरकारने मागील 9 वर्षात नवीन काहीच उभे केले नाही. उलट काँग्रेस सरकारने उभे केलेल्या सर्व बँका, रेल्वे, विमानतळे, विमा कंपन्या विकून टाकल्या. देश स्वतंत्र झाल्यापासून 68 वर्षांत सर्व सरकारांनी मिळून 55 लाख कोटी रुपयांचे कर्ज काढले पण मोदी सरकारने मागील 9 वर्षात तब्बल 100 लाख कोटी रुपयांचे कर्ज करुन ठेवले आहे. असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे. (Nana Patole On Modi Govt)

काँग्रेसची लढाई ही केंद्रातील तानाशाही सरकारच्या विरोधात असून मोदी सरकारने कर्जाचा बोजा वाढवून ठेवला असल्याचे पटोले यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “मोदी सरकारने महागाई प्रचंड वाढवली,
औषधे महाग केली, शेतीला लागणाऱ्या साहित्यावर 18 टक्के जीएसटी लावून शेतकऱ्यांना लुटले.
शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणसांकडून जीएसटीच्या माध्यमातून पैसे काढून मोदी त्यांच्या मित्रांचे खिसे भरत आहेत. उद्योगपतींची कोट्यवधी रुपयांची कर्जे माफ केली.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले
आणि सत्तेत येताच मोदी सरकार संविधानच संपवायला निघाले.
जनतेमध्ये केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तिघाडी सरकाबद्दल तीव्र नाराजी असल्याचे
जनसंवाद यात्रेत लोकांशी संवाद साधताना स्पष्ट दिसत आहे. जनतेशी सुरु झालेला हा संवाद
आता थांबणार नाही.”असा घणाघात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. (Nana Patole On Modi Govt)

तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील अमरावती जिल्ह्यातील
दर्यापूर येथील लोकांशी संवाद साधत जनसंवाद यात्रेमध्ये सहभाग नोंदवला.
यावेळी त्यांनी जनतेला केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील ट्रीपल इंजिन सरकार यांची धोरणे ही
कशी लोकहिताची नसल्याचे सांगितले. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसची
‘जनसेवा यात्रा’ सुरु असून आज (दि.08) यात्रेचा सहावा दिवस आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Radhakrishna Vikhe Patil | धनगर आरक्षणावरुन राधाकृष्ण विखे पाटलांवर टाकला भंडारा,
प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले… (व्हिडिओ)

हिंजवडी आयटी पार्कमध्ये मेफेड्रॉन, अफू विकणारे दोन राजस्थानी गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई

Wagle Ki Duniya | सोनी सबवरील वागले की दुनिया मालिकेतील परिवा प्रणती ऊर्फ वंदना म्हणाली,
भय आणि लोकलज्जेला मागे टाकून ब्रेस्ट कॅन्सरवर खुलेपणाने चर्चा करणे महत्त्वाचे आहे

Pashmina – The Thread Of Love | सोनी सबवरील पश्मिना मालिकेत निशांत मलकानी साकारणार
व्यवहारचतुर दिग्गज उद्योगपती राघवची भूमिका

दुचाकीवरुन जाताना विजेचा खांब डोक्यावर पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना

श्रद्धाताई गोरक्ष (आप्पा) परांडे जनहित मंच आयोजित भव्य महिला दहिहंडी उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंजवडी आयटी पार्कमध्ये मेफेड्रॉन, अफू विकणारे दोन राजस्थानी गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई

Maharashtra Student Innovation Challenge | महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये नोंदणीसाठी मुदतवाढ

Women Employment | अविवाहित महिलेला सरकारी नोकरी नाकारणे सरकारला पडले महागात; हाय कोर्टाने दिला निर्णय