सरकार सुडाचं राजकारण करतंय, प्रवीण दरेंकरांची मुख्यमंत्र्यांवर ‘नाराजी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षाची कोंडी करण्याचं काम सध्या सत्ताधारी महाविकास आघाडीकडून केले जात आहे असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. दरेकर यांनी असा आरोप करण्याचे कारण देखील तसेच आहे. मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे सरकारने प्रवीण दरेकर यांचा मुंबईतील सरकारी बांगला काढून घेतला आहे.

त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी सरकरांकडून विरोधकांची गळचेपी होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच दरेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तर सरकार सूड भावनेतून हे काम करत असल्याचा देखील आरोप दरेकर यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये सरकारने सर्व मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीला सुरुवात केली आहे यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च देखील केला जात आहे. मात्र विधान परिषदेत विरोधी पक्षनेते असूनही भाजपचे प्रवीण दरेकर यांना आपला बांगला सोडावा लागल्याने त्यांनी ठाकरे सरकार विरोधात आपली नाराजी व्यक्त करून सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हंटले आहे.