मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या दक्षिणेत मान्सून Monsoon दाखल झाल्यापासून राज्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने rain हजेरी लावली आहे. आज सकाळपासून मुंबईसह परिसरात रिमझिम पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यानंतर आता पुढील तीन तासांत मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पावसचा rain इशारा हवामन खात्याकडून देण्यात आला आहे. याशिवाय प्रशासनाला सज्ज राहण्याचा सल्ला हवामान खात्यानं Meteorological Department दिला आहे.
सध्या मान्सूनने महाराष्ट्रात दक्षिण भागासह पुणे, रायगड, अलिबाग या परिसरात धडक मारली आहे.
पुढील तीन तासात मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारा वाहण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.
तसेच आकाशात विजा चमकत असताना घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
या जिल्ह्यात मुसळधार
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्यात पुढील दोन ते तीन तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाला सुरुवात झाली आहे.
विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाण्यात विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरु झाला आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, परभणीमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे.
पाणी असणार्या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या
RBI ने केला नाही व्याजदरात बदल, जाणून घ्या कुठे FD केल्याने मिळेल जास्त फायदा
Paytm ची खास ऑफर ! घराचे आणि दुकानाचे भाडे भरा अन् मिळवा 10 हजार रुपयाचा ‘कॅशबॅक’
दररोज दह्यासोबत गुळाचं सेवन या वेळी करा, Immunity वाढण्यासह होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या
Paytm ची खास ऑफर ! घराचे आणि दुकानाचे भाडे भरा अन् मिळवा 10 हजार रुपयाचा ‘कॅशबॅक’