काँग्रेसचा मोठा निर्णय ! राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदावरून सचिन पायलट यांची हकालपट्टी
जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसकडून सचिन पायलट यांची मनधरणी करण्यात आली. मात्र, यामध्ये अपयश आल्यानंतर काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायलट यांना हटवण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी गोविंद सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.
Sachin Pilot removed as Deputy Chief Minister, announces Congress leader Randeep Singh Surjewala #Rajasthan pic.twitter.com/5tj3TJxZe8
— ANI (@ANI) July 14, 2020
सरकारविरोधात बंड करणाऱ्या सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांविरोधात काँग्रेसने कठोर कारवाई केली आहे. पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरून आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं आहे. तर त्यांच्या समर्थक आमदारांची मंत्रीपद काढून घेण्यात आली आहेत. काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर प्रवक्ते सुरजेवाल यांनी याबाद्दलची माहिती दिली. पूर्ण बहुमतानं निवडून आलेलं सरकार पाडण्यामगे भाजपचं षडयंत्र आहे. सत्ता आणि पैशांचा वापर करून, ईडी आणि आयकर विभागाकडून दबाव आणून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहे. काँग्रेसच्या आमदारांना पैसे देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न होत आहे. भाजपच्या रचलेल्या कटकारस्थानात पायलट अडकले आणि त्यांनी जनतेनं निवडून दिलेल्या सरकारला धक्का लावण्याचा प्रयत्न केल्याचे सुरजेवाल यांनी पायलट आणि भजपला सुनावलं आहे.
सचिन पायलट यांच्यावर कारवाई करतानाच त्यांचे समर्थक आमदारांवरही पक्षानं कारवाई केली. विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांना मंत्रिपदावरून काढून टाकण्यात आलं आहे. आम्ही गेल्या 72 तसांपासून सचिन पायलट यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांच्या माध्यमातून सोनिया गांधींनी पायलट यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. के.सी. वेणुगोपाल त्यांच्याशी अनेकदा बोलले. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न झाले. पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले असल्याचे सांगण्यात आले. काही मतभेद असतील तर ते संवादातून सोडवू असेही आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे सुरजेवाल यांनी सांगितलं.