जाणून घ्या राखी बांधण्याचे शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि रक्षाबंधनाचे महत्व

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रत्येक भावा-बहिणीला ज्या गोष्टीची प्रतिक्षा असते तो रक्षाबंधन सण जवळ आला आहे. रक्षाबंधनाच्या उत्सवाची रेलचेल सध्या सगळीकडे पहायला मिळत आहे. सध्या कोरोनाचे संकट असले तरी उत्साह दिसून येत आहे. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केल्या जाणाऱ्या या सणाला बहीण आपल्या भावांकडून राखी बांधून सुरक्षेचं वचन घेते. तर दुसरीकडे भाऊ आपल्या बहिणीला तन, मन, धनाने रक्षेचं वचन देतो.

कधी साजरा केला जातो रक्षाबंधन
हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक वर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरा केला जातो. यावेळी सोमवार 3 ऑगस्टला रक्षाबंधन केले जाणार आहे.

काय आहे आख्यायिका ?
रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली, याबद्दल निश्चित पुरवा नाही. पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चलत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडे मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाली. प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते.

पौर्णिमा तिथी सुरुवात – 2 ऑगस्ट रात्री 9.28
पौर्णिमा तिथी समाप्त – 3 ऑगस्ट रात्री 9.28
राखी बंधण्याची पूजा – विधी
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. तर भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देऊन तिला तिचं रक्षा करण्याचं वचन देतो.
सर्वात आधी राखीचं ताट सजवा. त्यात थोडं कुंकू, अक्षता, तांदूळ, दिवा आणि राखी ठेवा
त्यानंतर भावाला टिळा लावून त्याच्या उजव्या हातावर रक्षा सूत्र म्हणजेच राखी बांधावी.
राखी बांधल्यानंतर भावाची आरती करावी.
त्यानंतर त्याला गोड खायला घालावे
जर भाऊ तुमच्यापेक्षा मोठा असेल तर त्याच्या पाया पडा
जर बहीण मोठी असेल तर भावाने पाया पडावे.
राखी बांधल्यानंतर भावांनी बहिणीला भेटवस्तू द्यावी.