आगामी 2-3 महिन्यात भाजपा महाराष्ट्रात सरकार बनवणार, रावसाहेब दानवे यांचा दावा

परभणी : भाजपा पुढील दोन महिन्यात महाराष्ट्रात सरकार बनवणार आहे, यासाठी आम्ही तयारी केली आहे, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघात पुढील महिन्यात होणार्‍या विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षाच्या अभियानांतर्गत परभणीमध्ये आयोजित भाजपा कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत संबोधित करताना दानवे यांनी हे वक्तव्य केले.

जालना येथे खासदार रावसाहेब दानवे यांनी म्हटले की, भाजपा कार्यकर्त्यांनी हा विचार करू नये की, महाराष्ट्रात आमचे सरकार अस्तित्वात येणार नाही. आपण पुढील दोन-तीन महिन्यात सरकार बनवणार आहोत. आम्ही यावर काम केले आहे. आम्ही (विधान परिषद) होणार्‍या निवडणुका संपण्याची वाढत पहात आहोत.

दानवे यांचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या समर्थनासह देवेंद्र फडणवीस यांनी गठित केलेल्या अल्पकालिन सरकारच्या पहिल्या वर्धापन दिनी आले आहे. फडणवीस आणि अजीत पवार यांना मागच्या वर्षी याच महिन्यात 23 तारखेला मुंबईच्या राजभवनात अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली होती.