Sharad Pawar | ”राज्यात सध्या अडचणी वाढतील अशी स्थिती”, शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता
रायगड : Sharad Pawar | देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. मात्र, सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे. राज्यात सध्या अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. महाराष्ट्रातील स्थिती बदलण्यासाठी, जनतेचे राज्य आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळालेल्या नवीन पक्षचिन्हाचे अनावरण आज किल्ले रायगडावर करण्यात आले. यावेळी पवार बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने नेते, कार्यकर्ते उपस्थितीत होते. राष्ट्रवादीने यानिमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
शरद पवार म्हणाले, निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे.
संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिहासिक भूमीत आपण आलोय. या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करुया.
दरम्यान, आजच्या कार्यक्रमासाठी शरद पवार यांना रायगड किल्ला सर करणे अशक्य असल्याने ते रोप-वे ने गेले.
तेथून गडावरील प्रवास त्यांनी पालखीने केला. शरद पवार यांच्या आजच्या कार्यक्रमाची दखल जवळपास सर्वच
विरोधकांनी घेतली आहे. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे इत्यादी नेत्यांनी पवारांवर खोचक टीका केली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन जेष्ठ नागरिकाची आत्महत्या, आंबेगाव येथील प्रकार
बसची वाट पहात थांबलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हडपसर येथील प्रकार