राज की बात ! … म्हणून खडसेंनी राष्ट्रवादीत केला प्रवेश, रामदास आठवलेंनी सांगितलं

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) हे राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहेत. खडसेंच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणाला वेगळे वगळण लागले आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे पडसाद राज्यात उमटत आहेत. यामध्ये भाजप (BJP), शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादीचे (NCP) नेते आघाडीवर आहेत. आता यामध्ये रिपाइं नेते (RPI) आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांची भर पडली आहे. भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाण्यावर आठवले यांनी भाष्य केले आहे. त्यांनी भाजप का सोडली यावर बोलताना खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामागची ‘राज की बात’ सांगितली आहे.

रामदास आठवले हे आज अतिवृष्टीग्रस्त बारामतीच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना खडसे यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, खडसे यांच्यासोबत 15-16 आमदार राष्ट्रवादीत जाणार नाहीत. ते आमदार नसल्याने राष्ट्रवादीत जाऊन आमदार होतील. त्यांना मंत्रीपद देखील मिळेल. पण त्यांच्यासोबत कोणीही जाणार नाही, असे सांगताना खडसे यांनी रिपाईंमध्ये यावं अशी माझी इच्छा होती. त्यांना पक्ष सोडायचा होता तर त्यांना रिपाइं चांगला पर्याय होता. मात्र, ते राष्ट्रवादीत गेले त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे आठवले म्हणाले.

रामदास आठवले पुढे म्हणाले, पूरग्रस्तांना केंद्राकडून मदत मिळाणार आहे. मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याची सर्वात आधी राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्य सरकाने आधी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून माहिती देणार असल्याचे सांगताना आठवले म्हणाल की, जीएसटीचे (GST) केंद्राकडे बाकी असलेले पैसे मिळतील. पण सद्यस्थितीबाबत सर्वांनी मिळून केंद्राकडे पाठपुरवा करायला हवा असे देखील रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.