का झाली सुशांतची हत्या ? सुब्रमण्यम स्वामींनी सांगितलं पहिलं कारण, दुसऱ्या कारणासाठी करतायेत ‘रिसर्च’

पोलिसनामा ऑनलाइन – भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर पुन्हा भाष्य केलं आहे. बुधवारी त्यांनी ट्विट करत सुशांतच्या हत्येमागे काय कारण असू शकतं हे सांगितलं आहे. सध्या त्यांचं हे ट्विट खूप व्हायरल होत आहे.

आपल्या ट्विटमध्ये सुब्रमण्यम स्वामी म्हणतात, “सुशांतच्या हत्येमागील पहिलं कारण स्पष्ट आहे. तो स्वावलंबी होता. तो एवढा टॅलेंटेड होता की, बॉलिवूडकडून त्याला दुर्लक्षित केलं जाणं शक्य नव्हतं. कारण ते त्याच्यासोबत स्पर्धा करू शकत नव्हते. त्यामुळं त्यांनी सुशांतला अशा प्रकारे खेळातून बाहेरच केलं. बाकी जे काही आहे ते बॉलिवूड सिनेमाचं कारण आहे.”

स्वामी लिहितात, “हत्येचं दुसरं कारण मी तुम्हाला नंतर सांगेन. हे थोडं राजकीय आहे. परंतु यासाठी मला अजून जास्त रिसर्च करावा लागेल.” आता दुसरं कारण सांगताना स्वामी एखाद्या नेत्यावर थेट आरोप तर कणार नाही अशी उत्सुकता निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात याचं उत्तर मिळेलच.

सुशांत सिंह राजपूत सुसाईड केसचे धागे सतत ड्रग माफियांकडे जुडताना दिसत आहे. रिया चक्रवर्ती देखील भावासह या प्रकरणात अडचणीत येत असताना दिसत आहेत.